अहिल्यानगर : राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली . परंतु शेतीसाठी पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने पाण्याअभावी शेतातील पिके शेवटच्या घटका मोजत आहेत . वीजेच्या लपंडावाला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी नगर – सोलापुर महामार्गावर दहिगाव येथे रास्ता रोको आंदोलन करत महावितरण विरोधात संताप व्यक्त केला .
महावितरण कडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले . नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या दहिगाव, शिराढोण, साकत खुर्द, साकत बुद्रुक, वाटेफळ, पारगाव,वडगाव तांदळी,रुईछत्तीसी या गावातील आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले. महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांच्या भावना समजुन घेत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवण्याची भुमीका शेतकऱ्यांनी घेतली होती .
त्यामुळे पोलीस प्रशासन व आंदोलकामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आठ दिवसापूर्वीच आंदोलनाचा इशारा देऊनही महावितरणने केलेल्या दुर्लक्षामुळे शेतीला पाणी देणे अशक्य झाले आहे. शेतातील पिके पाण्याअभावी जळत आहेत . शेतीसाठी पुर्ण दाबाने वीज पुरवठा करावा यासाठी नगर सोलापूर महामार्गावर रस्तावर शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन केले .
आंदोलनाच्या दणक्या मुळे महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता उमाकांत सपकाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा केली . पुर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यासाठी योग्य उपाययोजना करू असे लेखी आश्वासन शेतकऱ्यांना दिले . आंदोलनात अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ , दादासाहेब दरेकर माजी सरपंच सुनील म्हस्के, , जयवंत शिंदे, मा.सभापती राम साबळे, सामाजिक कार्यकर्ते शिवहरी म्हस्के, रु
ईछत्तीसीचे सरपंच रमेश भांबरे, दहिगावचे सरपंच मधुकर म्हस्के, महेश म्हस्के,ॲड पोपट म्हस्के, जावेद शेख, गणेश हिंगे, सुनील म्हस्के, बाळासाहेब ठोंबरे, वाटेफळचे सरपंच बाबासाहेब अमृते, रवी अमृते, बाबासाहेब चितळकर, पोपट गुंड, रामा चितळकर, विशाल बोचरे , पोपट पोटरे, बाबासाहेब बनकर, नाना गायकवाड, श्रीधर पवार, संपत वाघमोडे, भाऊसाहेब आन्हाड, तांदळीचे सरपंच दिपक घिगे,अनशाबापु म्हस्के,दत्तात्रय बनकर, पारगावचे सरपंच बोठे, सतिश म्हस्के, संतोष गुंड, नागेश वाघ आदींसह शेतकरी सहभागी झाले होते .