बेलापुरात पुन्हा घरातल्या वस्तूंनी घेतला पेट, कुटुंब झाले भयभीत, नेमकं काय आहे या मागचे खरं सत्य?

Published on -

श्रीरामपूर : बेलापूर खुर्द इथल्या पुजारी कुटुंबाच्या घरात गुरुवारी (दि. २७) अचानक काही वस्तूंनी पेट घेतला होता. त्यानंतर रविवारी (दि. ३०) पुन्हा असंच काहीसं घडलं.

या वेळी तर त्यांच्या घरी आलेल्या भाच्याचा शर्टही पेटला. या सगळ्या गोष्टींमुळे पुजारी कुटुंब चांगलंच घाबरलंय. आता पोलिस आणि अंनिससमोर या घटनांमागचं खरं कारण शोधण्याचं मोठं आव्हान आहे.

बेलापूर खुर्द गावात राहणाऱ्या मोहन केशव पुजारी यांच्या घरावर आठ दिवसांपूर्वी कोणीतरी दगड मारत होतं. त्यामुळे त्यांनी तिथे सीसीटीव्ही लावला.

दगड मारणं थांबलं, पण त्यानंतर घरातल्या वस्तू आपोआप जळायला लागल्या. गादी, उशी, प्लास्टिकच्या वस्तू अशा गोष्टी कशाही पेट घेऊ लागल्या. ही घटना घडून दोन दिवस शांततेत गेले.

पण गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी चार वाजता त्यांचा भाचा प्रथमेश हिंगणे अंघोळीला गेला तेव्हा त्याचा टॉवेल पेटला. इतकंच नाही, तर त्याचा शर्टही जळाला आणि त्याच्या पाठीला भाजलं.

या सगळ्याने पुजारी कुटुंबाला धक्काच बसलाय. बेलापूर खुर्द ग्रामपंचायतीने तर संपूर्ण घर धुऊन काढलं होतं. त्यानंतर दोन दिवस काहीच झालं नव्हतं. पण गुरुवारी पुन्हा आग लागल्याने कुटुंबाची भीती आणखी वाढली. गावातही हा विषय सगळीकडे चर्चेचा झालाय.

या सगळ्या घटना पाहता, यामागे जादूटोणा वगैरे काही नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितलं की, हे सगळं कोणीतरी जाणूनबुजून करत असावं.

या प्रकरणाचा तपास करून खरं काय ते बाहेर काढू, असा विश्वास त्यांनी दाखवला. रविवारी पोलिस उपनिरीक्षक सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळपे आणि अंनिसचे कार्यकर्ते देवीदास देसाई यांनी पुजारी कुटुंबाला भेट दिली. या घटनेची उकल करणं हे मोठं आव्हान आहे, असं हापसे यांनी सांगितलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!