नगर मनमाड महामार्गावर रोज अपघात होऊन अनेक कुटुंब उध्वस्त, आता होणार प्रशासनाचे वर्षश्राद्ध !

Published on -

Ahmednagar News : प्रशासनाच्या वेळकाढू पणामुळे आतापर्यंत नगर-कोपरगाव महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ तसेच अपघातात मृत्यमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ नगर-मनमाड महामार्गावर

सूतगिरणीजवळ रविवार दि. ३ डिसेंम्बर २०२३ रोजी प्रशासनाचे प्रतिकात्मक वर्षश्राद्ध घालून रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने केली आहे.

याबाबत पत्रकात देवेंद्र लांबे यांनी म्हटले, की नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने नगर-कोपरगाव ( एन एच १६०) या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर सुरु व्हावे, यासाठी ऑक्टोबर २०१९ पासून रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने वेळोवेळी अनेक आंदोलने करून प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्र आला आहे.

मागील वर्षी ३ डिसेंम्बर २०२२ रोजी याच रोडवर अपघातात निधन पावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली म्हणून तसेच प्रशासनाचा निषेध म्हणून नगर मनमाड रोडवर सूतगिरण, जोगेश्वरी फाटा येथे दशक्रिया विधी घालण्यात आला होता.

३ डिसेंबर २०२३ रोजी या आंदोलनाला तब्बल १ वर्ष पूर्ण होत असून प्रशासनाकडून अजून या रोडचा कामाला सुरुवात केलेली दिसत नाही. एकेरी वाहतूक, रोडवर पडलेली खड्डे यामुळे रोज अपघात होऊन अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत;

परंतु प्रशासनाने अजूनपर्यंत या रोडच्या कामाला सुरुवात न केल्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ तसेच अपघातात मृत्यमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ नगर- मनमाड रोड, सूतगिरणी जवळ रविवार दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी प्रशासनाचे प्रतिकात्मक वर्षश्राद्ध घालून रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!