Mula Dam Water : मुळा धरणाच्या लाभक्षेत्राचे शेती सिंचनाचे एक आवर्तन घटणार !

Published on -

Mula Dam Water : नगरच्या भंडारदरा व नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले असून राहुरीच्या मुळा धरणातून रविवारी, २६ नोव्हेंबरला पाणी सोडण्याची तयारी पूर्ण झाली. समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार

नगर व नाशिक येथील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती न दिल्याने पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

मुळा धरणातून पाणी सोडण्याची तयारी शनिवारपासून सुरू झाल्याने जायकवाडी पाटबंधारे विभागातील एच. गोकुळे, डी. एस. जवकर, गो. नी. जाधव यांच्कलह अ नगर मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील,

राहुरी विभागाचे धरण शाखा अभियंता राजेंद्र पारखे, शाखाधिकारी बी. बी. घोरपडे यांच्यासह पाटबंधारे कर्मचारी मुळा धरणावर तळ ठोकून होते. मुळा धरणातून जायकवाडीला पाणी गेल्याने मुळा लाभक्षेत्राचे एक आवर्तन कमी होईल.

धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार असल्याने जायकवाडी व नगर पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने मुळा नदीपात्रातील डिग्ग्रस,मानोरी, मांजरी, वांजुळपोई या पाणी साठवण बंधाऱ्याची पाहणी करून बंधाऱ्यावरील फळ्या काढण्याची तयारी सुरू केली.

शनिवारी मुळा धरणातील पाणीसाठा २२ हजार ८०६ दशलक्ष घनफूट होता. घरणाचा मृतसाठा ४ हजार ५०० दशलक्ष घनफूट, तर पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत १ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाण्याचे बाष्पीभवन होणार असल्याने धरणात १६ हजार ८०० दशलक्ष घनफूट पाणी वापरासाठी राहणार आहे.

शिल्लक पाण्यावर जिल्ह्यातील ९ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अवलंबून असल्याने या योजनाच्या लाभक्षेत्रातील नागरीकांना पिण्यासाठी १ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाण्याची ३१ जुलै २०२४ पर्यंतची तरतूद करण्यात आली आहे.

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी ३५० दशलक्ष घनफूट, वांबोरीच्या प्रसाद शुगर व संगमनेर तालुक्यातील युटेक (श्रीगजानन) हे दोन खासगी साखर कारखाने तसेच पारनेर तालुक्यातील माळकूप अँग्रोसाठी ८० दशलक्ष घनफूट पाणी राखीव आहे.

अगामी काळात राहुरीतील भागडा १०० व वांबोरी पाईप चारीच्या लाभक्षेत्रासाठी ३०० दशलक्ष घनफूट पाणी लागणार आहे. मुळा धरणाच्या पाण्यावर मुळा उजवा कालव्याच्या राहुरी, नेवासे, पाथर्डी या तीन तालुक्यासह शेवगाव तालुक्यातील आमरापूर गावच्या तसेच मुळा डावा कालव्याच्या राहुरी तालुका लाभक्षेत्रातील शेती सिंचनाचा प्रश्न अवलंबून असल्याने

डिसेंबर महिन्यात रब्बी हंगामातील तसेच उन्हाळ्यात पाण्याचे आवर्तन सोडावे लागणार आहे. २०२२ मध्ये मुळा उजवा कालव्यातून चार आवर्तन तसेच मुळा डावा कालव्यातून ५ आवर्तन, तर १५ ऑगस्ट ते ११ नोव्हेंबर या कालावधीत मुळा धरणातून जायकवाडीला २८ हजार दलघफू पाणी सोडण्यात आले होते.

जायकवाडीला सोडण्यात येणारे पाणी पाहता रब्बी व उन्हाळी हंगामात शेती पाण्याचे दोन आवर्तन काटकसरीने देण्याचे नियोजन आहे. समन्यायी धोरणानुसार मुळा धरणातून ३ हजार दलघफू पाण्याची तरतूद आहे. शेती व पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असलेले इतर घटक पाहता जायकवाडीला २ हजार दलघफू पाणी सुटणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!