अहमदनगरमधील भीषण अपघाताची मालिका सुरूच, दोघे ठार एक जखमी

दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला आहे.

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघाताची मालिका सुरूच आहे. नुकतेच अरणगाव शिवारात भीषण अपघातात दोघे ठार झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा अपघातासंदर्भात वृत्त आले आहे. दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले.

संगमनेर रस्त्यावर पोहेगाव हद्दीत गोदावरी उजव्या कालव्याजवळ दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला आहे.  शनिवारी (दि.२२) दुपारी ही घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार (एम.एच १५ जी.डब्लु ००३६) क्रमांकाची दुचाकी व (एम.एच.१५ जी.झेड.९६७३) क्रमांकाच्या दुचाकीची धडक होऊन त्यात भाऊसाहेब अंतु केदारे (वय ६०, रा. पारेगाव रोड, येवला) व करण सुभाष थोरात (वय १९, कोपरगाव) हे दोघे जण जागीच ठार झाले

तर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. स्थानिकांनी त्यांना तातडीने शिर्डी येथे उपचारासाठी नेले. परंतु ते दोघे उपचारापुर्वीत मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषीत केले. तर एका जखमीवर शिर्डी येथे उपचार सुरु आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News