Ahmednagar News : नगर तालुक्यातील भातोडी शिवारातील शेतकऱ्याच्या घराच्या पडवीतून ६९ हजार रूपये किंमतीचे ३० सोयाबीनच्या गोण्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना
शनिवारी (दि.२) पहाटे एक ते चार वाजेच्या दरम्यान घडली असून, याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Ahmednagar News
शेतकरी बाबासाहेब पंढरीनाथ काळे (वय ६१, रा. भातोडी) यांनी फिर्याद दिली आहे. काळे यांच्या शेतातील सोयबीन तयार करून ती गोण्यात भरून घराच्या पडवीत ठेवली होती. शनिवारी पहाटे चोरट्यांनी एक ते चार वाजेच्या दरम्यान सोयाबीनच्या सर्व गोण्या चोरून नेल्या आहेत.
६९ हजार रूपये किंमतीच्या ३० सोयबीनच्या या गोण्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. काळे यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती देत फिर्याद दाखल केली आहे. पोलीस अंमलदार एम. एन. भवार अधिक तपास करीत आहेत.