भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा … अन्यथा महापालिकेमध्ये कुत्रे सोडणार !

Pragati
Published:

Ahmednagar News : जसे नगर शहर वाढत आहे तशाच शहरात समस्या देखील वाढत आहेत. यातील भटक्या कुत्र्यांची समस्या सर्वात गंभीर बनली आहे. या कुत्र्यांनी आजवर अनेकांवर हल्ला देखील केला आहे .

याबाबत पालिकेला निवेदने दिली मात्र त्यांच्याकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज पालिकेत आंदोलन केले. यावेळी जर आगामी काळात या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर अहमदनगर महानपालिकेमध्ये कुत्रे सोडून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा अभिषेक कळमकर व विक्रम राठोड यांनी दिला आहे.

नगर शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढत असून, नगरकरांना अक्षरशा जीव मुठीत धरून वागावे लागत आहे. शहर तसेच उपनगरात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले, मोठी माणसे जखमी झालेली आहे. रात्रीच्या वेळी तर रस्त्यावरून फिरणे ही कठीण झाले आहे.

याबाबत वेळोवेळी मनपा कार्यालय येथे निवेदने देण्यात आली आहे. तरीही मनपाकडून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट रोखण्यासाठी कोणतीही ठोस पाऊले उचलली नाहीत. त्यामुळे मनपाच्या या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ आज नागरिकांनी आंदोलन केले.

यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्यासोबत चर्चा करून त्यांना याबाबत निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, मनपाकडून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट रोखण्यासाठी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला आहे.

प्रशासनाने सदर गंभीर विषयाची तातडीने दखल घ्यावी अन्यथा मनपाच्या आवारात भटके कुत्रे सोडण्यात येणार असून, शहरात व उपनगरात जवळपास १० ते १२ हजार मोकाट कुत्री आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावर या कुत्र्यांच्या झुंडीच पहायला मिळतात, अंधारात या झुंडी पदचाऱ्यांसह मोटारसायकल चालकांवर हल्ला करतात. कुत्र्यांच्या भीतीमुळे अनेकांचे अपघात झाले आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण होते.

मनपा प्रशासनाकडून कुत्रे पकडणे आणि निर्बिजीकरण करण्यासाठी खाजगी संस्था नियुक्त केल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्ष या संस्थेचे असे कोणतेही काम दिसून येत नाही, त्यामुळे नगरकरांचा त्रास वाढत चालला आहे.

सध्या शाळा, कॉलेज सुरू झाले आहे. विद्यार्थी पायी किंवा सायकलने शाळेत ये-जा करतात. त्यांनाही भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने या समस्येचे निराकरणा करण्यासाठी ठोस कारवाई करावी, अन्यथा अहमदनगर महानपालिकेमध्ये कुत्रे सोडून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा अभिषेक कळमकर व विक्रम राठोड यांनी दिला आहे.

यावेळी माजी महापौर अभिषेक कळमाकर, माजी नगरसेवक विक्रम राठोड, नलिनीताई गायकवाड, फारूक रंगरेज, सुदाम भोसले, नामदेव पवार, आसाराम कावरे, सचिन ढवळे, अंबादास बाबर, किरण सपकाळ, श्रवण काळे, फराज पठाण, सचिन नवगिरे, ससाने ताई, हेलन पाटोळे ताई, प्रशांत भाले, गिरीश जाधव, गौरव ढोणे, अनिस शेख, गणेश कळमकर, चैतन्य ससे, अभिषेक जगताप, अक्षय शेटे, राहुल घोरपडे, नितीन खंडागळे, अभिजीत अष्टेकर, गणेश झिंजे, सुनील भोसले, जेम्स अल्हाट, नरेश भालेराव, भीमराज कराळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe