Ahmednagar News : धरण उशाला असुनही १५ दिवसाला पाणी पुरवठा होणारे हे देशातील पहीलेच शहर !

Published on -

शेवगाव शहराला होणारा अनियमित पिण्याच्या पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा, या मागणीसाठी श्रीमती वसुधा सावरकर, राजश्री रसाळ व मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी व नागरिकांनी शेवगाव नगरपरिषदेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा नेत घोषणाबाजी करत नगरपरिषदेचा निषेध केला.

गेल्या कित्येक दिवसांपासून शेवगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, अनेक भागांत दहा ते दिवसांनी पाणी येत आहे. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडण्याची वेळ आली आहे.

याबाबत शेवगाव शहरातील श्रीमती वसुधा सावरकर, राजश्री रसाळ व तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली विविध घोषणा देत नगरपरिषदेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.

सविता भुजबळ, रुपाली तडवळकर, भाविका आर्य, शैला बडघे, बेबीताई मरकड, ज्योती नांगरे, अनिता गुणवंत, गिता नांगरे, मनिषा मरकड, योगिणी पाटील, अंजली भुजबळ, अर्चना जाजू, सीमा बोरूडे, विद्या राजे, संगीत रायकर, अनुराधा क्षिरसागर, अनिता शिंदे, चंद्रप्रभा कांबळे, उमा मानधने, पद्मा भड़के, मनिषा गवळी, सुचित्रा देशपांडे, सुवर्णा दहिवाळकर, रेखा शिंदे, अलका नांगरे, रेखा गवळी, उषा कुलकर्णी, शोभा शिनगारे, द्वारका शिंदे, अर्चना काथवटे, मंगल देसाई, उमा देहाडराय, रूक्मिणी जाधव, वैशाली पन्हाळे, मिना पलोड, रेखा भंडारी, सोनल शेळके, उज्वला डोम, सुर्यकला ढाकणे, प्रमिला काळे, राजश्री बडे आदी महिलांनी महिलांच्या पाण्याबाबतच्या व्यथा नगरपरिषदेच्या प्रशासनासमोर मांडल्या.

दहा ते पंधरा दिवसांनी होणाऱ्या या पाणी पुरवठ्याने शहरातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. कित्येक सर्वसामान्य कुटुंबाकडे इतके दिवस पाणीसाठा करण्याकरिता व्यवस्था नसल्याने नागरिक घरात टाक्या, बकेट, भांड्यांमध्ये पंधरा दिवस पाणी साठवून ठेवतात.

साठलेल्या उघड्या पाण्यामध्ये डेंग्यूचे डास, अळ्या होत असून नागरिकांना डेंग्यूची बाधा होत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वितरण व्यवस्थेत आपण तातडीने लक्ष घालावे जेणेकरून शहराला किमान चार दिवसाला तरी पाणी पुरवठा होईल, याबाबत तातडीने पावले उचलली जावीत.

धरणातून मुबलक पाणी मिळत असुन ही परिस्थिती का निर्माण होत आहे याचा ही सखोल अभ्यास नगरपरिषदेच्या प्रशासनाने करणे आवश्यक आहे. नविन पाणी पुरवठा योजनेचे सत्य नगरपरिषदेने नागरिकांसमोर मांडणे आवश्यक असुन, मलिद्याच्या खेळात सर्व सामान्य शेवगावकरांना वेठिस धरण्याचे काम किमान नगरपरिषदेच्या प्रशासनाने तरी करू नये. असा इशारा महिलांच्या वतीने देण्यात आला.

या परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे जेणे करुन शहराला किमान चार दिवसाला तरी मुबलक पाणी पुरवठा होईल. तरी येत्या आठ दिवसात या परिस्थितीत आपण तातडीने सुधारणा न केल्यास शहरातील महिला भगिनींच्या नेतृत्वाखाली पुन्हा नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

याप्रसंगी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने दिपक कोल्हे, सोनाली वारे, पाणी पुरवठा विभागाचे शरद लांडे यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. मोर्चात संजय बोरुडे, महेश आर्य, मंगेश लोंढे, गणेश डोमकावळे, अजिंक्य अधारे, अविनाश गवते, प्रसाद लिंगे, बाळासाहेब डाके, संदिप गवळी, बाळा वाघ, निवृती आधाट, जनार्दन रायकर, ज्ञानेश्वर कुसळकर, संदिप गवळी, प्रतिक रांधवणे आदी उपस्थित होते.

सामान्य शेवगावकर अंत्यत सहनशील असून, त्यांच्या सहनशीलतेचा अंत प्रशासनाने पाहू नये. धरण उशाला असुनही १५ दिवसाला पाणी पुरवठा होणारे हे देशातील पहीलेच शहर असावे आमच्या माता भगिणींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडण्याची परिस्थिती निर्माण होण्यासाठी नगरपरिषद प्रशासन जबाबदार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe