काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री नितीन गडकरींचा ‘तो’ व्हिडिओ केला ट्विट

मुंबई- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचा गंभीर आरोप केल्यानंतर आता काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा लोकसभा निवडणुकीनंतरचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. माझ्या नागपूर लोकसभा मतदारसंघातील जे माझे जवळचे, नातेवाईक मतदार होते, अशा साडेतीन लाख लोकांची नावे मतदार … Read more

महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचे राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन

मुंबई- महायुती मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आणि सरकारमधील गैरव्यवहारांच्या आरोपांविरोधात शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून ११ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि मुंबईतील सर्व विभागांमध्येही हे आंदोलन होणार आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथील स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याशेजारी होणाऱ्या आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार आहेत. महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर … Read more

रेशनचे धान्य साठवण्यासाठी राज्यात ७५ गोदामे उभारण्यात येणार, गोदामांच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता

पुणे- राज्यातील रेशन दुकानांना (रास्त भाव धान्य दुकाने) वितरित करण्यात येणारे धान्य साठवण्यासाठी नव्याने ७५ गोदामे उभारण्यात येणार आहेत. १.२८ लाख मेट्रिक टन इतके धान्य साठवण्यासाठी या गोदामांच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाची सद्यस्थिती दर्शवणारी माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. … Read more

भाजीपाल्यांचे दर घसरल्यामुळे शाकाहारी थाळीच्या किंमती झाल्या कमी, डाळींच्या किमतीत वार्षिक १४ टक्क्यांनी घट

भाज्यांच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्यामुळे जुलैमध्ये घरी शिजवलेल्या शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणाच्या सरासरी किमतीत घट झाली. शाकाहारी थाळीची किंमत वर्षानुवर्षे १४ टक्क्यांनी घसरून ३२.६ रुपयांवरून २८.१ रुपयांवर आली आहे. पण मासिक आधारावर त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जूनमध्ये किंमत २७.१ रुपये होती, असे क्रिसिल इंटेलिजेंसच्या रोटी-चावल दर अहवालामध्ये म्हटले आहे. टोमॅटो, कांदे आणि … Read more

ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार, वर्षअखेरीस ठाण्यात मेट्रो सुरू होणार असल्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

ठाणे- ठाण्यात मेट्रो वर्षअखेरीस सुरू करण्याचा मानस असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ वी वर्षा मॅरेथॉन रविवारी ठाण्यात उत्साहात पार पडली. या स्पर्धेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी झेंडा दाखवल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले की, मुंबई एमएमआरमध्ये मेट्रोचे जाळे मजबूत करण्यात येणार आहे. त्यामुळे … Read more

एसटी महामंडळाचे काही अधिकारी फक्त टोपल्या टाकू काम करत आहेत त्यामुळे एसटी अडचणीत, कर्मचारी संघटनेचा आरोप

मुंबई- एसटी महामंडळाच्या उत्पन्नात कमालीची घट होत असून भाडेवाढीच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचा निष्कर्ष काढून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत २५ कोटी रुपये इतकी उत्पन्नात तूट आल्याची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली होती. पण महामंडळाकडून बातमीचा खुलासा करताना तुटीऐवजी ‘तोट्याचा’ उल्लेख करण्यात आला असून एसटीच्या उत्पन्नात वाढ होऊन ती अडचणीतून बाहेर निघावी, या चांगल्या … Read more

अकोले तालुक्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी तालुका बाल संरक्षण समितीची स्थापना

अकोले- तालुक्यात गेल्या काही वर्षात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अकोले व राजूर पोलीस ठाण्यात पोक्सोचे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. या आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे अकोले तालुका बाल संरक्षण समिती बरोबरच नगर बाल संरक्षण समिती, ग्राम बाल संरक्षण समिती कागदावरच असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या वृत्ताची दखल घेत अकोल्याचे तहसीलदार … Read more

नेवासा तालुक्यातील मंदिरातील टाळ चोरीचा गुन्हा पोलिसांनी २४ तासातच आणला उघडकीस, आरोपींना अटक

नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाच्या पितळी टाळ चोरीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. चोरीस गेलेल्या २२४०० रुपये किमतीच्या २८ पितळी टाळांसह चोरीसाठी वापरलेली ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे. दिनांक २८ जुलै रोजी सकाळी सिद्धेश्वर भजनी मंडळाच्या टाळ चोरीला गेल्याचे समजल्यावर अशोक बाबासाहेब चौधरी (वय … Read more

शेतकऱ्यांनो! वास्तव स्वीकारून सात नंबर अर्ज भरा अन्यथा भविष्यात शेती धोक्यात येऊ शकते

कोपरगाव- शेतीसाठी सिंचनाचे आवर्तन कमी होत चालल्याने आणि पाण्याचा साठा घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आता कल्पनेच्या विलासात न राहता वास्तव स्वीकारून सात नंबर अर्ज भरण्याची आवश्यकता आहे, असे मत माजी नगराध्यक्ष व शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी शुक्रवारी, दि. १ ऑगस्ट रोजी कोपरगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी बोलताना पद्माकांत कुदळे … Read more

निष्क्रीय आणि कर्तव्यशून्य अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, छावा ब्रिगेडची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर- राजूर येथील आदिवासी प्रकल्पामधील निष्क्रीय आणि कर्तव्यशून्य अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी छावा ब्रिगेडच्या वतीने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले, की संबंधित अधिकाऱ्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करत छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी संबंधित … Read more

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेसाठी अधिक संवेदनशीलतेने काम करावे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना

राहाता- महसूल विभाग हा थेट सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असल्याने महसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलतेने, तसेच सकारात्मक संवादाच्या माध्यमातून काम करावे. यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण होईल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहाता येथे महसूल विभागातर्फे आयोजित ‘महसूल सप्ताह – २०२५’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी माजी … Read more

श्रीरामपूर शहरातील आठवडे बाजार पुन्हा जुन्या जागेवरच भरणार, आमदार हेमंत ओगले यांच्या पुढाकारातून प्रश्न लागला मार्गी

श्रीरामपूर- गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीरामपूरचा बाजार दोन ठिकाणी भरल्याने व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आमदार हेमंत ओगले यांनी काल पुढाकार घेत विक्रेते व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मोरगे वस्ती, अक्षय कॉर्नर परिसरात जागेची आखणी करून रस्त्यावर तसेच शाळा व हॉस्पिटलला अडथळा होणार नाही, अशा स्थितीत विक्रेते व शेतकऱ्यांनी आपली दुकाने लावावी, अशा … Read more

अहिल्यानगर पोलिसांनी बनावट नोंटाचा कारखाना केला उद्धवस्त, २ कोटींचा बनावट नोटांचा कागद हस्तगत, ७ आरोपी अटक

अहिल्यानगर : अहिल्यानगर ते सोलापूर रस्त्यावरील आंबिलवाडी शिवारात पानटपरी चालकाला सिगारेटचे पाकिट घेवून बनावट नोटा देणाऱ्यास नगर तालुका पोलिसांनी अटक केली. पोलिस तपासात तिसगाव, वाळूज, जि. छत्रपती संभाजीनगर येथील भाडेतत्त्वावर घेतलेल्या बंगल्यामध्ये सुरू असलेला बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. तीन ते चार वर्षांपासून हा कारखाना सुरू होता. त्यात सात जणांना अटक करून त्यांच्याकडून ५९ … Read more

पाथर्डी तालुक्यात कोणी गुंडगिरी केली तर त्याला फोडून काढले जाईल, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचा इशारा

पाथर्डी- हिंदु मुस्लिम असा वाद करु नका. माणुस म्हणुन आपण सर्वजण सारखेच आहोत. चांगेल कर्म करा चांगलेच होईल. तुम्ही एकतेने रहा प्रेमाने वागा. देव सर्वांचाच आहे. भक्ती मार्ग स्वीकारा. येथील देवाच्या दारात भेद भाव नको. तुम्ही चांगले राहीले तर प्रशासन तुम्हाला मदत करील. मात्र कोणी गुंडगिरी केली तर त्याला फोडुन काढले जाईल, असा इशारा पोलिस … Read more

अहिल्यानगरमधील कैकाडी समाज बांधवांनी आमदार सुरेश धस यांची भेट घेत मानले आभार, सभागृहात कैकाडी समाजाविषयी उठवला होता आवाज

मिरजगाव- नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात कैकाडी समाजाच्या न्याय विषयी भूमिका मांडल्याने आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कैकाडी समाज बांधवांच्यावतीने त्यांच्या या भूमिकेचे स्वागत व समर्थन करून आभार मानण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील कैकाडी समाजाची परिस्थिती अतिशय दयनीय असुन विदर्भात त्यांचा समावेश एस.सी प्रवर्गामध्ये आहे. तर मराठवाड्यात त्यांचा समावेश व्ही.जे.एन.टी प्रवर्गामध्ये आहे. एकच समाज दोन वेगवेगळ्या प्रवर्गात … Read more

तिसगावचा तलाठी सतीश धरम ५० हजारांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडला

करंजी- पाथर्डी तालुक्यातील तिसगाव आणि आडगाव या दोन गावांसाठी असलेले तलाठी सतीश रखमाजी धरम (वय ४० वर्षे) यास गुरुवारी ५० हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय सुभाष घोरपडे (वय २७वर्ष धंदा-शेती रा. शिंगवे केशव) यांनी दि.३१ जुलै २०२५ रोजी लेखी तक्रार दिली की, तक्रारदार … Read more

सतत गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकाची सात दिवसात बदली करा, कोरडगावच्या नागरिकांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

कोरडगाव- पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील ग्रामपंचायत ही परीसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असुन कोरडगाव येथील लोकसंख्या जवळजवळ सहा हजाराच्या आसपास पोहचलेली असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार मोठा आहे. त्यामध्ये ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे दोन गावचा कार्यभार असल्याने पुर्ण वेळ गावांसाठी देता येत नाही जे दिवस गावांसाठी निवडलेले आहेत. त्या पैकी ग्रामसेवक एकही दिवस हजर राहत नाही असे काम कोरडगाव … Read more

छत्रपती शिवरायांना शाहिरीच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी सातासमुद्रापार नेले- सामाजिक कार्यकर्ते मालोजीराजे भिताडे

राशीन- छत्रपती शिवरायांना शाहिरीच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी सर्वप्रथम सातासमुद्रापार रशियात नेले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची जागृती आणि चळवळ अण्णा भाऊ साठे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवली म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मालोजीराजे भिताडे यांनी केले. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त मातंग एकता आंदोलन या सामाजिक संघटनेतर्फे साठे चौकात आयोजित … Read more