नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या गैरकारभारासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेले उपोषण मागे, मागण्या मान्य करत अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

अहिल्यानगर- बीपीसीएल कंपनीने ग्रामपंचायतीला नुकसान भरपाई पोटी वर्ग केलेल्या पैशाचा गैरव्यवहार थांबवावा, नागरदेवळे गावठाणमधील अमरधाम दुरुस्ती व्हावी, गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळावा, प्रशासक म्हणून ग्रामविस्तार अधिकारी यांची नियुक्ती व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा परिषद येथे ग्रामस्थांनी अमरण उपोषण केले. या मागणीची दखल घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण तिसऱ्या दिवशी मागे … Read more

सशक्त समाजासाठी महिला सबलीकरणाची गरज, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले यांचे प्रतिपादन

अहिल्यानगर- समाजाच्या विकासासाठी महिलांना सक्षम करणे, त्यांच्यामध्ये महिलांना शिक्षण, आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक संधीमध्ये समान संधी मिळवून देणे हे गरजेचे आहे. तसेच सशक्त समाजासाठी महिला सबलीकरणाची गरज असून अशा कार्यशाळेचे आयोजन करणे गरजेचे आहे. विद्यापीठ व महाविद्यालय अशा कार्यशाळा घेत आहे त्याचा अभिमान आहे. असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले यांनी व्यक्त केले. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पात ५० टक्क्यांपेेक्षा अधिक पाणीसाठा, जाणून घ्या इतर धरणामध्ये किती आहे पाणीसाठा?

अहिल्यानगर- जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पात सध्या पन्नास टक्क्याहून (१५ टीएमसी) अधिक पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी जुलै महिन्यात अवघा १६ टक्के पाणीसाठा प्रकल्पात होता. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर राहिल्यास यंदा लवकरच कुकडी प्रकल्पातील धरणं ‘ओव्हरफ्लो’ होण्याची शक्यता आहे. यंदा अगदी मे महिन्यापासूनच पावसाचे आगमन झाले आहे, मात्र कुकडी पाणलोट क्षेत्रात … Read more

अहिल्यानगर शहरातील पेमराज सारडा महाविद्यालयात उत्साहात पार पडला भाषा महोत्सव, संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे अनोखे एकत्रीकरण

अहिल्यानगर- सध्या राज्यात भाषांवरून राजकारण पेटलेले असताना पेमराज सारडा महाविद्यालयात संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे अनोखे एकत्रीकरण करत भाषा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील ११ वी व १२ वी मधील विद्यार्थी महोत्सवात सहभागी होत चारही भाषांच्या विविध पैलूंची ओळख करून घेतली. यानिमित्त सभागृहात चारही भाषांच्या भित्तीपत्रकांचे छोटेसे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या … Read more

सरकारच्या योजनांचा लाभ पारधी समाजापर्यंत थेट पोहोचवा, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे निर्दैश

अहिल्यानगर- पारधी समाज व वंचित घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. मात्र अनेकदा या योजनांचा लाभप्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्यांच्या विकासाची गती मंदावते. पारधी समाज तसेच वंचित घटकांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत ते … Read more

अहिल्यानगर शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पूर्णाकृती पुतळ्याचे २७ जुलैला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार भूमिपूजन

अहिल्यानर- शहरातील माळीवाडा वेस येथे उभारण्यात येणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित पुतळा उभारणीच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले कृती समितीच्या वतीने झालेल्या बैठकीत हा पुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन २७ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संध्याकाळी ५ वाजता होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तर हा कार्यक्रम फक्त माळी समाजापुरता मर्यादीत … Read more

सायकलवर घराकडे निघालेल्या इसमाचा कोल्हार पुलावर ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू, ट्रकचालक फरार

कोल्हार- कोल्हारच्या पुलावर ट्रकखाली चिरडून सायकस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. ट्रक चालक घटनेनंतर पसार झाला आहे. सलीम बाबू शेख ( वय ६३ रा. अंबिकानगर, कोल्हार) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फळ विक्रेत्याचे नांव आहे. काल दुपारी चारच्या सुमारास मयत सलीम शेख आपल्या सायकलवरून कोल्हार खुर्द कडे जात असताना आर जे १९ … Read more

संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागील खरा काटेरी सुत्रधार कोण आहे हे ओळखा- माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर- संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे केवळ काटे नव्हे, तर खरे ‘काटेरी’ सूत्रधार कोण आहेत, हे ओळखण्याचे आवाहन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. गुन्हेगार कोणताही असो, त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी जोरदारपणे मांडली. संगमनेर बसस्थानक येथे आयोजित निषेध आंदोलनात छात्र भारती, राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बहुजन … Read more

अहिल्यानगरमध्ये पती-पत्नीच्या किरकोळ वादातून पतीने छातीवर वार करत केली आत्महत्या तर पत्नीनेही मारली इमारतीवरून उडी

अहिल्यानगर- पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यात वादातून पतीने स्वतः छातीत चाकूने वार करून घेत आत्महत्या केली. पत्नीनेही घराच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना एमआयडीसीजवळील गजानन कॉलनी येथे वडगाव गुप्ता रस्त्यावर गुरूवारी दि. १७रोजी रात्री घडली. अनिल ध्रुव खरवाल (वय २६) असे मयताचे नाव असून, … Read more

बनावट ॲपच्या माध्यमातून कोट्यावधींचा घोटाळा केल्याप्रकरणी शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांवर होणार कारवाई?

सोनई- शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांना मुंबई येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नोटीस बजावली असून, दिनांक २५ जुलै रोजी मुंबईत उपस्थित राहून म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी दिनांक १८ जुलै रोजी विश्वस्त मंडळाच्या वतीने वकीलांनी कार्यालयात उपस्थित राहून पुढील तारखेची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर २५ जुलै ही पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली आहे. आमदार … Read more

सोयाबीन पिकावर औषध व्यवस्थीत का मारले नाही असे विचारल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यात घातला कोयता, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला

अहिल्यानगर- शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचे दिसल्याने औषध व्यवस्थित का मारले नाही, असे विचारल्याच्या रागातून तिघांनी त्याच्या कोयत्याने हल्ला केला. ही घटना १७ जुलै रोजी सकाळी घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नवनाथ सूर्यभान नाटक, गीताराम सूर्यभान नाटक व अन्य दोघांचा संशयित आरोपीमध्ये समावेश आहे. याबाबत भानुदास सूर्यभान नाटक (वय … Read more

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा राहुरी तालुक्यातील मावा-तंबाखू विक्रेत्यांवर छापा, १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी भागातील मावा व सुगंधीत तंबाखू विक्रेत्यांवर छापा घालून एक लाख ४६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वांबोरी येथील मावाचा कारखाना उद्ध्वस्त केला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात दोघाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल ऊर्फ पिनू गोरक्षनाथ जाधव (वय ३०, रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यास … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील जलजीवन योजनेत मोठा भ्रष्टाचार, खासदार भाऊसाहेब वाकचौरे व नीलेश लंके यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

अहिल्यानगर- जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचार आणि अहिल्यानगर शहरातील अमृत फेज-२ योजनेच्या दिरंगाईवरून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दिशा समितीची बैठक वादळी ठरली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि नीलेश लंके यांनी अधिकाऱ्यांना कसून जाब विचारत या प्रकरणांना लोकसभेच्या अधिवेशनात उपस्थित करण्याची घोषणा केली. जलजीवन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आणि अमृत फेज-२ योजनेत ठेकेदाराला अनावश्यक मुदतवाढ दिल्याचा गंभीर … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा

मुंबई, दि. 17 – आगामी काळात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ हे महत्त्वाचे विमानतळ असणार आहे. त्यामुळे हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी नुतनीकरण व विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा आज श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील विधानभवनातील बैठकीत घेण्यात आला. … Read more

संगमनेरमधील ‘त्या’ ठेकेदार कंपनीची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, आमदार अमोल खताळ यांची विधानसभेत मागणी

संगमनेर- पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात ४ जुलै रोजी झालेल्या स्कूलबस अपघातप्रकरणी जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या बसचे फिटनेस ऑडिट करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून १ जानेवारी ते ३१ मे … Read more

सुपा परिसरातील नागरिकांना जादा परतावा देण्याच्या नावाखाली ‘सिस्पे कंपनी’ ने घातला ४०० कोटींचा गंडा, गुंतवणूकदार आक्रमक

जातेगाव- सुपा येथील ‘सिस्पे कंपनी’ ने गाशा गुंडाळल्याने सुपा परिसरातील गुंतवणूकदारांचे सुमारे चारशे कोटी रुपये बुडाल्यात जमा आहे. मोठा परतावा देण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या सुपा परिसरातील हजारो गुंतवणूकदारांचे सुमारे चारशे कोटी रुपये अडकले आहेत. ‘सिस्पे कंपनी’ ने गाशा गुंडाळला असून, सुमारे चार महिन्यांपासून फक्त लवकरच तुमचे पैसे मिळतील काळजी करू नका, अशा भूलथापा दिल्या जात … Read more

काँगेस पक्षाला विचारधारा आहे, पक्ष संकटात असतांना अनेक जण सोडून गेले मी गेलो नाही, भविष्यात काँग्रेसला नक्कीच चांगले दिवस येणार- माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर- १९८५ साली सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून आपण निवडून आलो. मागील ४० वर्ष राजकारणात राहिलो. पराभव हा अनपेक्षितच होता. इतकी मोठी संधी तालुक्यातील जनतेने मला दिली, १८ वर्ष मंत्रिमंडळात राहिलो. काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पातळीवरही मला मोठी संधी दिली. मतदार संघातही मी चांगली विकास कामे केली, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. याबाबत … Read more

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपीवर कठोर कारवाई करावी, तसेच गायकवाड यांना पोलीस संरक्षण द्यावे, श्रीरामपूरमध्ये विविध संघटनाचे निवेदन

श्रीरामपूर- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर तालुका संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात जावून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना काल बुधवारी देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे शाईफेक करून भ्याड हल्ला करण्यात आला. … Read more