पाथर्डी तालुक्यात गांजाची शेती करणाऱ्याला पोलिसांनी छापा टाकत पकडले, १० किलोचा गांजा केला जप्त

पाथर्डी- तालुक्यातील माणिकदौंडी विभागातील चेकेवाडी येथे पाथर्डी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात विक्रीसाठी तयार गांजा व शेतातील गांजाची झाडे मिळून दहा किलो ७९० ग्रॅम गांजा जप्त केला. बाजारभावाप्रमाणे त्याची किमत सुमारे दोन लाख रुपये आहे. पोलिसांच्या धडक कारवाईने ग्रामीण भागात अवैधधंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांनी मावा, अवैध दारू विक्री व अंमलीपदार्थ विक्री विरुद्ध … Read more

गोदावरीच्या उजव्या कालव्याला लवकरच पाणी सोडण्यात येणार, आमदार आशुतोष काळे यांची माहिती

कोपरगाव- गोदावरी कालव्यांना तातडीने ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून सोमवारपासून गोदावरी डाव्या कालव्याला ओव्हरफ्लोचे पाणी सोडले असून उजव्या कालव्याला देखील लवकरच पाणी सोडणार असल्याची माहिती आ. काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. पावसाळा सुरु होवून दीड महिन्याचा कालावधी पूर्ण … Read more

विकासकामात विखे कुटुंब कोणताही भेदभाव करत नाही, जनतेच्या हितासाठी जीवात जीव असेपर्यंत कार्य करत राहू- शालिनीताई विखे पाटील

राहता- मतदारसंघ वेगळा असला, तरी लोकहितासाठी विखे कुटुंब विकासकामात कोणताही भेदभाव करत नाही. गरजेनुसार आणि जनतेच्या हितासाठी सार्वजनिक कामांना नेहमीच प्राधान्य दिले आहे आणि जीवात जीव असेपर्यंत हे कार्य अविरत सुरूच राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहाता तालुक्यातील वाकडी येथे आयोजित एका कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या … Read more

राहुरीतील ग्रामीण रुग्णालयाची माजी आमदार प्राजक्त तनपुरेंनी घेतली झाडाझडती, रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारावर व्यक्त केला संताप

राहुरी- शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त असून, त्या अनुषंगाने माजी मंत्री प्राजक्त तनपूरे यांनी १४ जुलै रोजी अचानक रुग्णालयात भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि गंभीर सुविधांच्या अभावावर संताप व्यक्त केला. राहुरी ग्रामीण रुग्णालयातील परिस्थिती अत्यंत दयनीय असून, रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळत नाहीत. … Read more

राज्यातील साखर कामगारांना १० टक्के वेतनवाढ मिळणार, खासदार शरद पवारांनी घेतला बैठकीत निर्णय

सोनई- राज्यातील साखर उद्योग व जोड धंद्यातील कामगारांना दहा टक्के वेतनवाढ व १६ महिन्याचा फरक देण्याचा निर्णय माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी काल सोमवारी (दि. १४) मुंबई येथे झालेल्या बैठकीत जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कामगार प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष डी. एम. निमसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथील बैठकीला महाराष्ट्र … Read more

योजनांची अंमलबजावणी करण्यात शिर्डी मतदारसंघ अहिल्यानगर जिल्ह्यात आघाडीवर,शालिनीताई विखे यांचे प्रतिपादन

शिर्डी- महायुती सरकारने सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी शिर्डी मतदारसंघात प्रभावीपणे होत असून, या क्षेत्राने राज्यात अग्रस्थान प्राप्त केले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे समाजातील सर्व घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने शिर्डी … Read more

राहुरी शहरातील भर बाजारपेठेतील सोन्याच्या दुकाने चोरट्यांनी फोडले, ५० लाखांचा ऐवज केला लंपास

राहुरी शहर- चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात भामट्यांनी काल सोमवारी दि. १४ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी शहरातील भर बाजारपेठेतील सराफ व्यावसायिक राजेंद्र भन्साळी यांच्या वर्धमान ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात चोरी केली. यात सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला आहे. या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की राजेंद्र सुरजमल … Read more

नगर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती

वाळकी- नगर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचनेतील प्रारूप प्रभाग रचनेत लोकसंख्येच्या प्रमाणीकरणामुळे जुन्या वाळकी जिल्हा परिषद गटातील वाळुंज हे गाव दरेवाडी गटात समाविष्ट करण्यात आले. जेऊर गटातील आगडगाव नागरदेवळे गटात तर जेऊर गटात रतडगाव हे गाव समाविष्ट करण्यात आले. बहुतांशी गटांची लोकसंख्या ही ५२ हजार मतदारांच्या आसपास करण्यात आली. प्रारूप प्रभाग … Read more

राज्यात सरसकट जमीन मोजणी मोहीम राबवण्यात येणार, आमदार शिवाजीराव गर्जे यांच्या पाठपुराव्याला यश

पाथर्डी- राज्यात शेतीच्या बांधांवरील आणि रस्त्यांवरील सुरू असलेल्या वादांना कायमचा पूर्णविराम देण्यासाठी राज्य शासनाने आधुनिक पद्धतीने सरसकट जमीन मोजणीचे निर्णय घेतला आहे. राजव्यापी अभियान राबविण्याचा विधान परिषदेच्या सभागृहात आ. शिवाजीराव गर्जे यांनी ही मागणी लावून धरली होती, त्यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. सभागृहात बोलताना आ. गर्जे म्हणाले, ‘पूर्वी’ … Read more

सीसीएमपी धारक डॉक्टरांची मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करा अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा डाॅक्टरांचा इशारा, जामखेड तहसीलदारांना निवेदन

जामखेड- महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये सीसीएमपी धारक डॉक्टरांची रजिस्ट्रेशन करण्यास स्थगिती दिल्याबद्दल जामखेड तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनतर्फे काल जामखेड येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, संदर्भात १६ जुलैपासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणास जामखेड तालुक्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांचा पाठिंबा असणार आहे. जामखेड येथील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.९ जानेवारी … Read more

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना त्वरित पैसे मिळण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे बँकेकडून आवाहन

अहिल्यानगर- रिझर्व्ह बँक व केंद्रीय निबंधक विभागाच्या परवानगीनुसार नगर अर्बन को ऑप. मल्टीस्टेट बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ५ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी असलेल्या खातेदार, ठेवीदारांना ५० टक्के रक्कम परत मिळण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत संगमनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, शेवगाव, बेलापूर येथील खातेदारांना पैसे परत मिळाले आहेत. अजूनही सुमारे ५५० ठेवीदार, खातेदारांचे अर्ज केवायसी प्रक्रिया … Read more

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका, खासदार निलेश लंकेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अहिल्यानगर- शासनाच्या नगरविकास विभागाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार ‘ड’ वर्ग महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग प्रणाली लागू करण्यात आली आहे. हा आदेश महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ५ अन्वये राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने जारी करण्यात आला असून, त्यानुसार प्रभाग रचना करताना २०११ च्या जनगणनेचा, भौगोलिक सलगतेचा व लोकसंख्येतील समतोल यांचा आवश्य विचार करावा. प्रभाग रचना करताना … Read more

भिंगार शहराचा विकास खुंटलाय, स्वतंत्र नगरपालिकेमुळे विकासाला चालना मिळणार- भाजर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते

अहिल्यानगर- छावणी परिषदेमुळे भिंगार शहराचा विकास खुंटला होता. नागरिक सोयी सुविधांपासून वंचित होते, यासाठी नगर दक्षिणचे तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत भिंगारला स्वतंत्र नगरपालिका करा किंवा भिंगारचा समावेश नगरच्या महानगरपालिकेत करावा, अशी मागणी करीत लोकसभेतही आवाज उठवला होता. त्यास आता यश आले असून भिंगारला स्वतंत्र नगरपालिका करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

श्रीगोंदा तालुक्यात चोरट्यांनी केली साठ वर्षाच्या वृद्ध महिलेला मारहाण, सोन्याची पोत तसेच कानातील सोन्याचे फुले-वेल बळजबरीने नेले तोडून

श्रीगोंदा- मुलाच्या खोलीला कडी लाऊन झोपेतून जागे झालेल्या साठ वर्षाच्या वृद्ध महिलेला मारहाण करत गळ्यातील सोन्याची पोत तसेच कानातील सोन्याचे फुले-वेल बळजबरीने तोडून घेत ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील निमगांव खलू येथे घडली. या घटनेत श्रीमती चंपावती दत्तात्रय दिवटे (वय-६०), ही वृद्धा गंभीर जखमी झाली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस … Read more

इतिहासात पहिल्यांदाच जुलैमध्येच जायकवाडी धरण ७५ टक्के भरले, शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

हातगाव- राज्यात नं. २ ची पाणीक्षमता असणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी (पैठण) जलाशय जवळपास ७५ टक्के भरल्याने शेवगाव तालुक्यातील काही गावांतील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ही आकडेवारी काल सोमवार (दि.१४) जुलैची असून, गतवर्षी याच दिवशी याच तारखेला धरणात ४.०१ टक्के पाणीसाठा असल्याची नोंद आहे. या जलाशयाचा उजवा कालवा बीड जिल्ह्यातील माजलगावपर्यंत १३२ किमी अंतराने … Read more

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या बिग बुल नवनाथ आवताडेच्या विरोधात गुंतवणूकदार उतरले रस्त्यावर, मुख्यमंत्र्याची भेट घेणार

श्रीगोंदा- श्रीगोंदा, पारनेर तसेच राज्यातील विविध भागांत शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. नवनाथ अवताडे हा संचालक असलेल्या सर्व कंपन्यांची तातडीने चौकशी करून सर्व मुख्य आरोपींना तातडीने अटक करावी. आरोपींनी गोळा केलेली गोरगरिबांची रक्कम कुठे आहे, याची चौकशी करून ती रक्कम ताब्यात घेऊन गुंतवणूकदारांना परत देण्यात यावी. जिल्ह्यात या कंपन्यांसारख्या असंख्य कंपन्या … Read more

अहिल्यानगरमध्ये गावठी पिस्तूल आणि गांजा विकायला आलेल्या दोन परप्रांतीय तरूणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, ८३ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत

अहिल्यानगर- तोफखाना पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपोवन रस्तावरील हिंदवी चौकात दोन परप्रांतीय तरुणाना ताब्यात घेऊन गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस, गांजा असा ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाईं सोमवारी दि. १४ दुपारी करण्यात आली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र टटिया बारेला (वय २०), सचिन नानुराम … Read more

गुरुपौर्णिमेच्या तीन दिवसाच्या उत्सवात साईबाबा संस्थानला साईभक्तांनी तब्बल ६ कोटी ३१ लाख रूपयांची देणगी केली अर्पण

शिर्डी- श्री साईबाबा संस्थानच्या वतीने ९ ते ११ जुलै २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांनी विविध माध्यमांतून तब्बल ६ कोटी ३१ लाख ३१ हजार ३६२ रुपयांची भरघोस देणगी अर्पण केली. या देणगीची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. पत्रकात म्हटले, की या देणगीत रोख स्वरूपात १ कोटी ८८ लाख … Read more