अहिल्यानगरमधील ‘या’ ग्रामपंचायतीने सामूहिक घरकुल वसाहतीमध्ये राज्यात पटकावला प्रथम क्रमांक!

Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील वांगदरी ग्रामपंचायतीने पंतप्रधान आवास योजनेतून (PMAY) सन २०२२-२३ मध्ये घोड नदीच्या काठावर दोन एकर जागेवर बांधलेली ४२ घरकुलांची वसाहत राज्यात प्रथम क्रमांकाची ठरली आहे. अमृत महाआवास अभियानांतर्गत ही वसाहत आदर्श ठरली असून, आज (दि. ३ जून २०२५) पुण्यातील बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलात केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

जामखेड पंचायत समितीचा महाआवास अभियानात राज्यात प्रथम क्रमांक, आज पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

Ahilyanagar News: जामखेड- पंचायत समितीने महाराष्ट्र सरकारच्या महाआवास अभियानांतर्गत २०२२-२३ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाशिक विभागात सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर आता राज्यस्तरावरही अव्वल ठरल्याने जामखेडने यशाचा नवा टप्पा गाठला आहे. आज (दि. ३ जून २०२५) पुण्यातील बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलात केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या … Read more

आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून विहीर, सोलर पंप, ठिबक सिंचन अन् शेती अवजारासांठी मिळतंय भरमसाठ अनुदान, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे. ही योजना २०१६-१७ पासून राबवली जात असून, अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. दरवर्षी अहिल्यानगर जिल्ह्यात चारशेहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून विविध कृषी उपकरणे, सिंचन सुविधा आणि आर्थिक … Read more

निवडणुकीच्या तोंडावर बेरोजगार तरूणासांठी महायुती सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री योजनादूत’ योजना झाली बंद? 

महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘मुख्यमंत्री योजनादूत’ योजना जाहीर केली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि सरकारच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश होता. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तात्पुरत्या स्थगितीवर गेलेली ही योजना नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही पुन्हा सुरू झालेली नाही. … Read more

सुजय विखेंनी लोकसभेतल्या पराभवाचा तनपुरे कारखाना निवडणुकीत काढला वचपा, खासदार निलेश लंके समर्थकाचा केला करेक्ट कार्यक्रम!

Ahilyanagar Politics: राहुरी- तालुक्यातील डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने अहमदनगरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. या निवडणुकीत तनपुरे गटाच्या जनसेवा पॅनलने शेतकरी विकास मंडळाचा २१-० ने दारुण पराभव केला. माजी खासदार सुजय विखे यांनी या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली असली तरी त्यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला घेतल्याची चर्चा आहे. राजू शेटे … Read more

पाथर्डी तालुक्यातील येळी शिवारात मिनी बस पलटी, १० जण जखमी तर ४ जणांची पकृती चिंताजनक!

Ahilyanagar News: पाथर्डी- तालुक्यातील येळी शिवार येथे कल्याण-विशाखापट्टणम (निर्मल) राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. मिनी बस (टेम्पो ट्रॅव्हलर क्र. एम एच २० डी डी ०९६१) चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. या अपघातात १० प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे … Read more

सत्यजित ताबेंचं बोलणं बालिशपणाचं, ज्यांनी मदत केली त्यांचं ऋण विसरायचं नसतं- बाळासाहेब थोरात

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर-  विधानपरिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षावर टीका करताना पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यात त्यांनी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना एक तासात राहुल गांधींची भेट घेण्याचे आव्हान दिले होते. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सत्यजित यांचे वक्तव्य बालिश … Read more

संगमनेरमधील चहावाल्याच्या मुलाला एमबीए करून परदेशात लागली १५ लाखांची नोकरी, संघर्षावर मात करत पोरानं आई-बापाच्या कष्टांचं पांग फेडलं!

Ahilyanagar News: संगमनेर- शहरातील चहाविक्रेते दीपक साळुंके यांचा मुलगा प्रज्वल साळुंके याने कठीण परिस्थितीतून मार्ग काढत व्यवसाय व्यवस्थापनातील (एमबीए) पदव्युत्तर पदवी संपादन केली आणि कॅरिबियन बेटावरील सेंट किट्स अँड नेव्हिस येथे आंतरराष्ट्रीय कंपनीत १५ लाख रुपये वार्षिक पॅकेजवर नोकरी मिळवली. दीपक साळुंके यांच्या छोट्याशा चहाच्या टपरीतून सुरू झालेला हा प्रवास प्रज्वलच्या मेहनतीने आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने … Read more

जीएस महानगर बँकेच्या सासू-सुनेच्या लढतीत सुनेने मारली बाजी, गीतांजली शेळके यांच्या पॅनेलचा १८ जागा जिंकत दणदणीत विजय

राज्यातील अग्रगण्य सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २०२५ च्या संचालक मंडळ निवडणुकीत गीतांजली उदयराव शेळके यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत गीतांजली शेळके यांच्या पॅनेलने ८० टक्के मते मिळवून विरोधी पॅनेलच्या सुमनताई शेळके यांच्या गटाचा धुव्वा उडवला. एक जागा बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित १७ जागांवरही गीतांजली … Read more

वाळकीचे आरोग्य केंद्र, आठवडे बाजार सुरळीत ! खा. नीलेश लंके यांच्या मदत मोहीमेचा इम्पॅक्ट

गेल्या आठवड्यात नगर तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी होऊन झालेल्या नुकसानीनंतर रविवारी खा. नीलेश लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या-त्या गावांमध्ये जात केलेल्या मदत कार्यामुळे तेथील जनजीवन सुरळीत झाले आहे. गाळाने माखलेले प्राथमिक आरोग्य केंद्र चकाचक करण्यात आल्याने ते सोमवारी सुरळीत सुरू झाले, आठवडे बाजार भरला तर जुंदरे मळयातील रस्ताही सुरू झाला. सारोळा कासार येथील वाहून गेलेला … Read more

अहिल्यानगरमध्ये महापुरुषांच्या मिरवणुका डीजेविना पारंपरिक पद्धतीनेच साजऱ्या कराव्यात- माजी खासदार सुजय विखे

Ahilyanagar News: अहिल्यानगर-  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव ३१ मे २०२५ रोजी यशस्वीपणे संपन्न झाला. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाला शहरातील सर्व स्तरांतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे या उपक्रमाची ख्याती राज्यभर पसरली.  या महोत्सवात पारंपरिक पद्धतीने … Read more

अहिल्यानगर जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जिल्हा बँक देणार २ लाखांचा अपघाती विमा मोफत!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या पीक कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या सुमारे चार लाखांहून अधिक रुपे किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकऱ्यांचा दोन लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्याचे ठरवले आहे. हा विमा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय सुरक्षा विमा योजनेंतर्गत असून, यासाठी लागणारा खर्च बँकेच्या स्वनिधीतून केला जाणार आहे. या … Read more

अहिल्यानगर बाजार समितीत सफरचंदाला मिळाला २० हजारांपर्यंत भाव! केशर आंब्यांचीही मोठी आवक

Ahilyanagar News: अहिल्यानगर- बाजार समितीत रविवारी (१ जून २०२५) फळांची एकूण ४७५ क्विंटल आवक नोंदवली गेली, ज्यामध्ये केशर आंब्याची सर्वाधिक २५१.८६ क्विंटल आवक होती. या बाजारात सफरचंद, आंबा, मोसंबी, संत्री, डाळिंब, पपई, नारळ, अननस, चिकू, अंजीर, पेरू, केळी, ड्रॅगन फ्रूट आणि जांभूळ यांसारख्या विविध फळांची विक्री झाली. सफरचंदाला प्रतिक्विंटल ९,००० ते २०,००० रुपये असा सर्वाधिक … Read more

अहिल्यानगर बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली, मेथीची जुडी ३० रूपयाला तर गवारीला मिळाला १२ हजार रूपये प्रतिक्विंटल भाव

Ahilyanagar News : अहिल्यानगर बाजार समितीत रविवारी (१ जून २०२५) विविध भाजीपाल्याची एकूण २०१९ क्विंटल आवक झाली, ज्यामध्ये १०,१६३ पालेभाज्यांच्या जुड्यांचा समावेश होता. या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू, गवार, टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोबी, काकडी, लिंबू, अद्रक, दुधी भोपळा, गाजर, शिमला मिरची यांसारख्या विविध भाज्यांची आवक नोंदवली गेली. मेथीच्या जुडीला कमाल ३० रुपये भाव मिळाला, तर … Read more

अवकाळी पाऊस थांबताच भंडारदऱ्यात काजव्यांचा झगमगाट, नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी पर्यटकांची वाढली गर्दी

Ahilyanagar News: भंडारदरा-  कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात काजव्यांचा लखलखता सोहळा अनुभवण्यासाठी देशभरातून हजारो पर्यटक दाखल होतात. काजव्यांच्या प्रजनन काळात रात्रीच्या वेळी झाडांवर चमकणारे कोट्यवधी काजवे निसर्गाचा एक अविस्मरणीय चमत्कार घडवतात. हिरडा, सादडा, बेहडा, आंबा आणि जांभूळ यांसारख्या झाडांवर लुकलुकणारे काजवे पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात, जणू गगनातील तारे जमिनीवर उतरले … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील खते-बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकांकडून ४५० कृषी केंद्रांची तपासणी, ५ दुकानदारांवर कारवाई

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात मे २०२५ मध्ये सरासरी २२० मिमी पाऊस झाल्याने यंदा खरीप हंगामातील पिकांची पेरणी वेळेत होणार आहे. या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने खरीप पेरणीचे नियोजन केले असून, बियाणे आणि खतांच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.  जिल्ह्यातील ४५० हून अधिक कृषी सेवा केंद्रांची तपासणी करून पाच दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. … Read more

अंगणवाड्यांमध्ये नवीन अभ्यासक्रम लागू! अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देऊन आधारशिला बालवाटिका’चा शुभारंभ

अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी यंदापासून ‘आधारशिला बालवाटिका’ हा नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांचा खेळ, क्रियाकलाप आणि आनंदी शिक्षणाद्वारे सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला जात आहे. या योजनेमुळे अंगणवाड्यांचा अधिक प्रभावी वापर होणार असून, मुलांना औपचारिक शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी आवश्यक सामाजिक, भावनिक आणि भाषिक कौशल्ये आत्मसात करता येणार … Read more

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खासदार नीलेश लंके उतरले मैदानात, हातात फावडं घेत आरोग्य केंद्रातील काढला गाळ

Ahilyanagar News: अहिल्यानगर- तालुक्यात २७ मे २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकी, अकोळनेर, वाळकी, अस्तगांव, सारोळा कसार, भोरवाडी, जाधववाडी आणि सोनेवाडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्ते आणि पूल वाहून गेले, जनावरे दगावली, आणि स्थानिक नागरिकांचे संसार उघड्यावर पडले. या संकटाच्या काळात खासदार नीलेश लंके यांनी नीलेश लंके प्रतिष्ठान आणि आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून तातडीने … Read more