अहिल्यानगर जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका चालकांचे ‘काम बंद’ आंदोलन स्थगित! रुग्णवाहिका चालकांच्या मागण्यांवर होणार चर्चा

अहिल्यानगर- जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहेत. ठेकेदार कंपनीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलावले आहे. महाराष्ट्र राज्य १०८ रुग्णवाहिका चालक युनियनच्या न्याय मागण्या व समस्या सोडवण्यासाठी राज्यभरातील १०८ रुग्णवाहिका चालकांनी दि. १ जुलै रोजी धरणे आंदोलन सुरू केले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चालकही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले होते. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील दोघा भावांनी खडकाळ माळरानावर फुलवली डाळिंब शेती, वर्षाकाठी कमवतायेत ३० ते ४० लाख रूपये

अहिल्यानगर जिल्ह्यातील देऊळगाव सिद्धी हे गाव दुष्काळी पट्ट्यातले. भूप्रदेश खडकाळ, सिंचनाची कोणतीही सोय नाही. अशा परिस्थितीत इंगळे कुटुंब शेती करत होते. हुलगा, मटकीसारखी कोरडवाहू पिकं घेऊन जे काही मिळेल त्यावर समाधान मानायचं, हाच शेतकऱ्यांचा मार्ग होता. पण इंगळे कुटुंबातील पुढच्या पिढीने परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. शिक्षण आणि शेतीचा संगम भाऊसाहेब इंगळे यांचे सुपुत्र ज्ञानदेव आणि … Read more

गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत ३ दिवस श्री साईबाबांचा भव्य उत्सव, असे असणार आहेत कार्यक्रम, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक?

शिर्डी- संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ९ ते ११ जुलै २०२५ या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या भव्य उत्सवामध्ये सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे. पत्रकात म्हटले, की गुरु-शिष्य परंपरा ही अत्यंत प्राचीन असून आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने दिली उघडीप, शेतकऱ्यांची चिंता वाढली! पेरलेली पिके वाया जाण्याची भीती

अहिल्यानगर- ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या. मात्र, शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातुर झाल्याचे चित्र दिसत आहे. मे महिन्यात पावसाने हजेरी लावली आणि शेतकरी सुखावल्याचे पाहायला मिळाले. परंतु पावसाळा सुरू झाल्यानंतर बहुतेक ठिकाणी अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस झाला. जमिनीची ओल पाहून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु त्यानंतर काही ठिकाणी अपवाद … Read more

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार काशिनाथ दाते यांनी अधिवेशनात उठवला आवाज

पारनेर- पारनेर-नगर मतदारसंघातील सुप्यापासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागांत दि. २७ मे रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगर तालुक्यातील वाळुबा नदीला आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले होते. यामध्ये रस्ते, शेती, पिके, जनावरे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आ. काशिनाथ दाते यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात नियम २९३ अंतर्गत … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिसांच्या कामकाजाबाबत २ हजार लोकांनी नोंदवले अभिप्राय, ९ जुलै असणार आहे अभिप्राय नोंदवण्याची शेवटची संधी

अहिल्यानगर- जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी कसे काम करतात. कोणत्या विभागात उणिवा आहेत. कोणता विभाग चांगला काम करतो. यासंदर्भात नागरिकांना आता थेट अभिप्राय देण्याची संधी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यावरील नागरिकांची मते जाणून सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी ३० जून ते ९ जुलै दरम्यान सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली आहे. … Read more

जवखेडे खालसा येथील मंदिरात पुन्हा आरती केल्यास दर्ग्यावर चादर चढवण्याचा मुस्लिम समाजाचा इशारा

करंजी- हिंदुत्ववाद्यांनी जवखेडे खालसा, ता. पाथर्डी येथे आज गुरुवार (दि.३) जुलै रोजी पुन्हा आरती केल्यास येथील मुस्लिम कार्यकर्त्यांनी दि.१० जुलै रोजी हजरत पीर बाबा रमजान उर्फ कान्होबाच्या दर्ग्यावर राज्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने चादर अर्पण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जवखेडे प्रकरणाबाबत आदेश डावलून न्यायालयाचा आ. संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे, स्थानिक सरपंच व अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध … Read more

चोरट्या मार्गाने केली भारतात घुसखोरी, मुंबईत बनवले बनावट आधारकार्ड; अहिल्यानगरमध्ये पकडलेल्या बांग्लादेशींच्या तपासात धक्कादायक माहिती समोर!

अहिल्यानगर- एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात विनापरवाना भारत देशात प्रवेश करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना पकडले. त्यांच्याकडे सर्वच ओळखपत्र बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून ते ओळखपत्र त्यांनी पाच वर्षांपूर्वी मुंबई परिसरात बनवले आहे. भारत देशात सीमेवरील चोरट्या मार्गाने त्यांनी प्रवेश केला. नगरमध्ये खडी क्रेशरवर काम करीत असताना ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचे … Read more

अहिल्यानगरमध्ये मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर : नागापूर एमआयडीसीतील राममंदिराजवळ राहणाऱ्या एकाने मानसिक छळास कंटाळून घराच्या छतावरील वीजेच्या ताराला हात लाऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना १६ जून २०२५ रोजी घडली. याबाबत १ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्रसिंह सुरेंद्रसिंह राठोड (रा. आदर्शनगर राममंदिराजवळ नागापूर एमआयडीसी, अहिल्यानगर) … Read more

श्रीरामपूरमध्ये घरातच बनवत होते बनावट देशी दारू, पोलिसांनी छापा टाकून आरोपींना घेतले ताब्यात

श्रीरामपूर : येथील शहर पोलिसांनी गोंधवणी परिसरात छापा टाकून बनावट देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. यावेळी १ लाख ६६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस … Read more

वंचित बहुजन आघाडीचा झंझावात! कार्यकर्त्यांची फौज तयार, स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी किसन चव्हाणांचा राज्यभर संघटन बांधणीचा निर्धार

पाथर्डी- राज्यात भारतीय जनता पक्षाला विरोधक राहिला नाही. कोणी इडी व सीबीआयच्या भीतीने गेले तर कुणी पक्षात सामील झाले. वंचित बहुजन आघाडीच प्रुमख विरोधक म्हणून भूमिका बजावत आहे. संघटना महत्वाची असते. प्रत्येक गावात वंचितचे ११ सक्रीय कार्यकर्ते तयार करून स्वाभिमानी युवकांची फौज तयार करण्याचे काम राज्यभर केले जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सदस्य तथा राज्य उपाध्यक्ष … Read more

तिसगावकरांची ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी फरफट, आठ दिवसाला नागरिकांना पाणी मिळणार

करंजी : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासंदर्भात बुधवारी पाथर्डी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत तिसगावचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा म्हणून चार दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते मन्सूरभाई पठाण, सतीश साळवे, सचिन खंडागळे, दिनेश ससाने, नितीन खंडागळे, पोपट शिरसाठ, अक्षय साळवे, नितीन लवांडे, … Read more

गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, राहुरीत ख्रिश्चन समाज आक्रमक! हजारोंचा मोर्चा

राहुरी- आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्म आणि धर्मगुरूंविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांच्या निषेधार्थ राहुरीत ख्रिश्चन समाजाच्या वतीने हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणी जोपर्यंत आमदार पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतल्याने काही काळ पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाड येथे राहणाऱ्या महलेने … Read more

संगमनेरमध्ये व्याजाचे पैसे न दिल्याने पती-पत्नीला धमकी, दोन सावकारांना संगमनेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

संगमनेर- व्याजाने दिलेल्या पैशाची रक्कम घेण्यासाठी महिला व तिच्या पतीला त्रास देऊन मोठी रक्कम उकळणाऱ्या नाशिक येथील दोघा खाजगी सावकारांना येथील पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. याबाबत येथील तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील प्रवीण विलास देशमुख यांनी कंपनीसाठी कैलास बाबुराव मैंद (रा. जेल रोड, नाशिक रोड) यांच्याकडुन त्यांच्याकडे असलेल्या मनी लैंडर लायसन्स … Read more

पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकांची धडाकेबाज कामगिरी, अहिल्यानगर शहरातील मावा बनवणारे कारखाने केले उद्धवस्त

अहिल्यानगर : सावेडी उपनगरातील संदेशनगरमधील सुगंधित तंबाखू व मावा तयार करण्याचा कारखाना बुधवारी (दि. २) पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी छापा घालून उद्ध्वस्त केला. सुमारे २ लाख २९ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चार जणांना ताब्यात घेतले. गोरक्षनाथ शंकर मुर्तडकर (वय ४८ रा. नवनाथ निवास, संदेशनगर, … Read more

कोपरगावमध्ये ६४ इमारती धोकादायक, पालिसा प्रशासनाने मालकांना पाठवल्या नोटीसा, लवकरच इमारती केल्या जाणार जमिनदोस्त

कोपरगाव- शहरातील तब्बल ६४ इमारती व घरे धोकादायक बनल्या आहेत. मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नगरपालिकेच्या नगर रचना विभागाच्या वतीने चार जणांच्या पथकाने केलेल्या सर्वे मधून ही माहिती समोर आली आहे. या ६४ जणांना पालिका प्रशासनाने नुकत्याच नोटीसा बजावल्या आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिलेल्या पत्रकात … Read more

शनिशिंगणापूर येथे बनावट ॲप तयार करून लाखोंचा घोटाळा करणाऱ्यांविरोधात काँग्रेसचे उपोषण, दोषींवर ठोस कारवाई करण्याची मागणी

Ahilyanagar News: सोनई- शनिशिंगणापूर येथे बनावट ॲप, बनावट देणगी पुस्तक, बनावट कोडच्या माध्यमातून गैरप्रकार झाला आहे. या प्रकरणी ठोस कारवाई करावी, या मागणीसाठी काल मंगळवारी पासून शनिशिंगणापूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य संभाजी माळवदे यांनी उपोषण सुरू केले आहे. लाखोंचा गैरव्यवहार गेल्या काही दिवसांपासून शनिशिंगणापूर देवस्थान हे बनावट ॲपमुळे अडचणीत आले आहे. येथील काही … Read more

राहुरी तालुका हे माझे आजोळ, त्यामुळे इथून पुढे राहुरीकडे लक्ष देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

Ahilyanagar News: राहुरी- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्यांनी आपापल्या भागात जबाबदारीने काम करावे. पक्षाचे सदस्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. अधिवेशन संपताच आपण राज्याच्या काही भागाचा दौरा करणार असून राहुरी तालुक्यासाठी वेळ देईन. जे आज येऊ शकले नाही, त्यांनी त्यावेळी उपस्थित राहावे. राहुरी हे माझे आजोळ असल्याने राहुरीकडे यापुढे लक्ष देईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष … Read more