जयपूर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील बहरोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी सहा अज्ञातांनी एके-४७ ने फिल्मी स्टाइल गोळीबार केला. यावेळी ४० वेळा गोळ्या झाडण्यात आल्या असता पोलिसांसोबत चकमकीचा प्रकार घडला आहे.
या हल्ल्यामागून ठाण्यात कैद असलेला कुख्यात गुंड विक्रम गुर्जर ऊर्फ पापला याला पळवून नेण्यात हल्लेखोर यशस्वी ठरले आहे. या आश्चर्यकारक घटनेमुळे संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे.

पोलिसांच्या भूमिकेवरही सोशल मीडियात सवाल उपस्थित केला जात आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. त्यासाठी परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. विक्रम गुर्जरला एक दिवस अगोदर पोलिसांनी अटक केली होती.
त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार होते; परंतु तत्पूर्वीच पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्याला पळविण्यात आले आहे. दरम्यान, विक्रम गुर्जर हा हरयाणातील मोस्ट वाँटेड गुन्हेगार आहे. त्याच्यावर हत्या, अपहरण आणि खंडणी वसूल करण्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. दुसरीकडे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी वरील घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
- महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन रेल्वे मार्ग ! ‘ही’ शहरे एकमेकांना जोडली जाणार, कसा असणार रूट ?
- कोणत्या राज्यात पहिल्यांदा आठवा वेतन आयोग लागू होणार ? महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार 8th Pay Commission
- स्वतःचा बिजनेस सुरु करायचाय ? मग दीड लाखाच्या गुंतवणूकीत ‘हा’ बिजनेस सुरु करा, दरमहा मिळणार 60 हजारापर्यंतचा नफा
- जमीन खरेदी विक्रीच्या नियमांत मोठा बदल, ‘हे’ 4 नवीन नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत !
- IDBI Bank Bharti 2025: IDBI बँक अंतर्गत 650 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा