नगर : आज माजी खासदार आणि माजी आमदार यांच्या मध्ये मनोमिलन झाले. आमच्यातली कटुता ही पेल्यातील वादळ होती असे त्यांनी सांगितले. अशाच प्रकारचे मनोमिलन या दोघांमध्ये नगर शहराच्या विकासासाठी झाले असते तर शहरातील मतदारांना आनंद झाला असता.
मात्र केवळ तीन दिवसावर येऊन ठेपलेली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यांच्यामध्ये झालेल्या मनोमिलन यामुळे मतदारांमध्ये काहीही फरक पडणार नसून वंचित बहुजन आघाडी शिवसेना उमेदवाराच्या निश्चित पराभव करेल, असा विश्वास उमेदवार किरण काळे यांनी व्यक्त केला आहे.

नगर शहराचा उड्डाणपुलाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. हा प्रश्न विशेषत: खासदार यांच्या अखत्यारीत येतो. राज्यात आणि केंद्रात युतीची सत्ता होती. माजी आमदार आणि माजी खासदार या दोघांनी मिळून ताकद लावली असती तर निश्चित हा प्रश्न मार्गी लावू शकले असते.
परंतु केवळ निवडणुकीपुरते राजकीय तडजोड करणे यातच धन्यता मानणारे या शहराचा काय विकास करणार असा सवाल काळे यांनी केला आहे. त्यामुळेच आता अशा प्रकारच्या मनोमीलनामध्ये सामान्य मतदारांना कोणताही रस नसल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
वंचितच्या जाहीर नाम्यात सांगितल्या प्रमाणे निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत आपणच उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून नगरकरांना विकास काय असतो हे दाखवून देऊ असे काळे यांनी म्हटले आहे.
- सोलापूर बाजारात कांद्याच्या आवकीत घट, तरीही भावांमध्ये उसळी नाही; शेतकऱ्यांच्या पदरी निराशा
- गेल्या दहा वर्षांत केंद्रीय अर्थसंकल्पातील शेतकरी योजनांनी कृषी क्षेत्राला दिली नवी दिशा
- कमी ईएमआयमध्ये रॉयल एनफील्ड हंटर 350 घरी आणण्याची संधी; तरुण रायडर्ससाठी परवडणारा पर्याय
- अर्थसंकल्पापूर्वी ईपीएफओ पेन्शनधारकांना दिलासा? किमान पेन्शन वाढीवर सरकारची हालचाल
- Realme P4 Power 5G भारतात लाँच; 10,001mAh ‘टाइटन बॅटरी’, 144Hz डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह स्मार्टफोन बाजारात एन्ट्री













