अहमदनगर ब्रेकिंग : दिवाळी सणानिमित्त गावी जाणारे घरी पोहोचलेच नाहीत ! भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : दिवाळी सणानिमित्त गावी जात असलेल्या पीकअप वाहनाला शनिवारी (दि. (११) पहाटे अपघात झाला असून यामध्ये तिघा जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. नगर तालुक्यातील चास शिवारात पुण्याहून नगरच्या दिशेने येताना थांबलेल्या पिकअपला खासगी बसने मागून जोराची धडक दिली.

यात दोन पुरुष व एक महिला ठार झाली आहे, तर अन्य बाराजण जखमी झाले आहेत. मयत व जखमी हे बीड व धाराशिव जिल्ह्यातील आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात एका पेट्रोल पंपासमोर एक कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी थांबली. त्यामागे पिकअपही येऊन थांबली.

त्यानंतर काही सेकंदात मागून आलेल्या खासगी बसने पिकअपला जोराची धडक दिली. यात पिकअपमधील तिघांचा मृत्यू झाला, तर बारा जण जखमी झाले. यामध्ये बस चालकही जखमी झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी दाखल केले. पिकअपच्या पुढे उभ्या असलेल्या कारचेही अपघातात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक युवराज चव्हाण पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

अपघातात सारिका कागदे, प्रविण कागदे (वय २६, दोघे रा. मोरगाव, जि. बीड), दीपक चव्हाण (रा. पखरूड, ता. भूम) हे मयत झाले आहेत. तर सुरज कागदे ( वय १८), बजरंग कागदे ( चालक), धीरज कागदे (वय १७),

मच्छिद्र कागदे, राहुल कागदे (वय २३), सीता कागदे, आरुषी कागदे (वय ९), आरती कागदे (वय २१), श्रुती कागदे (वय १४, सर्व रा. मोरगाव, जि. बीड), धीरज जोगदंड (रा. पिंपळगाव, ता. वाशी, जि.धाराशिव) हे जखमी झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe