पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचा मोठा निर्णय! अहिल्यानगर जिल्ह्यातील २२ अधिकाऱ्यांच्या करण्यात आल्या बदल्या

Ahilynagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी प्रशासकीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जोमाने करताना जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत महत्त्वपूर्ण बदल घडवले. शुक्रवारी उशिरा त्यांनी २२ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांना विविध पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती दिली.  या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलिस प्रशासन अधिक सक्षम … Read more

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना जाहीर, निवडणुका नवीन आरक्षण सोडतीनुसारच होणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर : अखेर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार, अहिल्यानगर जिल्हा परिषदेसाठी यंदा 75 गट आणि 150 पंचायत समिती गणांसाठी निवडणुका होणार आहेत. नवीन प्रभाग रचना तयार झाल्यानंतर नव्याने आरक्षण सोडत होऊन निवडणुका पार पडतील, अशी माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ग्रामविकास विभागाने निवडणूक … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘हे’ धरण 40 वर्षात पहिल्यांदाच जूनमध्ये ओव्हरफ्लो! 220 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यातही अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण यावर्षी जून महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले असून, ४० वर्षांत प्रथमच मान्सूनच्या सुरुवातीलाच धरण भरल्याची अभूतपूर्व घटना घडली आहे. १४ जून २०२५ रोजी सकाळी सात वाजता … Read more

श्रीरामपूर तालुक्यात उस लागवडीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, कारखान्यांना गाळप हंगाम धोक्यात, संचालकांची चिंता वाढली

Ahilyanagar News: श्रीरामपूर- तालुक्यात यंदा ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाल्याने साखर कारखान्यांपुढे गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे मोठे आव्हान आहे. अशोक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा फक्त ६,५०० हेक्टरवर ऊस लागवड झाली, तर मागील वर्षी ८,००० हेक्टरवर लागवड नोंदवली गेली होती. मागील हंगामात इतर कारखान्यांनी जास्त भावाचे आमिष दाखवून ऊस तोडल्याने आणि काहींनी वचनानुसार भाव न … Read more

… म्हणून श्रीरामपूरच्या आदिवासी कुटुंबांनी राष्ट्रपती,पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छा मरणाची परवानगी!

Ahilyanagar News: श्रीरामपूर- तालुक्यातील निपाणीवडगाव येथे प्रवरा डाव्या कालव्यास लगत गेल्या ३०-४० वर्षांपासून राहणाऱ्या ८० ते ९० मागासवर्गीय, आदिवासी आणि वंचित कुटुंबांवर अतिक्रमणाची कारवाईची टांगती तलवार आहे. संबंधित विभागाने सात दिवसांची अंतिम नोटीस बजावल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता पसरली आहे.  या संकटाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवासी भागचंद अभिमान नवगिरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान … Read more

शेवगाव-पाथर्डीतील नुकसानग्रस्त भागाची आमदार राजळे यांच्याकडून पाहणी, पंचनामे करून तातडीने मदत देण्याचे आदेश

Ahilyanagar News: शेवगाव-  शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांना ११ जून २०२५ रोजी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जोरदार तडाखा दिला. या नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पिकांचे, विशेषतः केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले, तसेच अनेक घरांचे आणि मालमत्तेचेही नुकसान झाले. दहिफळ गावात झाड कोसळल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले.  या पार्श्वभूमीवर आमदार मोनिका राजळे … Read more

श्रीगोंदा तालुक्यात कांद्याच्या भावात वाढ, चांगल्या प्रतिच्या कांद्याला मिळतोय प्रतिक्विंटल एवढे रूपये बाजारभाव

Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यात यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले, पण मार्च महिन्यात भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत आले होते. उत्पादन खर्च आणि बाजार भाव यांचा मेळ न बसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा वखारीत साठवून ठेवला. याचा परिणाम म्हणून बाजारात कांद्याची आवक कमी झाली, आणि शुक्रवारी (१३ जून २०२५) श्रीगोंद्यात चांगल्या कांद्याला २१ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. गेल्या … Read more

अहिल्यानगर महापालिकेला दोन महिन्यात नागरिकांनी भरला तब्बल २२ कोटींचा कर, महापालिकेच्या सूट योजनेला मोठा प्रतिसाद

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महानगरपालिकेच्या हद्दीतील १ लाख ३१ हजार ३२८ मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कर, पाणीपट्टी, घरपट्टी, रस्ता कर, सांडपाणी व्यवस्थापन, अग्निशमन कर आणि घनकचरा कर अशा विविध स्वरूपात कर वसूल केला जातो. सध्या १९४ कोटींची थकबाकी आणि यंदाच्या वर्षाचे ६५.५६ कोटी मिळून एकूण २५९ कोटी रुपये वसूल करायचे आहेत.  एप्रिल-मे २०२५ मध्ये १० टक्के सवलतीच्या योजनेमुळे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात १४ महिन्यांत ३४९० बाळांचा झाला जन्म, अस्पष्ट जननेंद्रिय असलेल्या दोन नवजात बाळांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्हा रुग्णालयात गेल्या १४ महिन्यांत, म्हणजेच एप्रिल २०२४ ते मे २०२५ या कालावधीत, ३,५७४ महिलांच्या प्रसूती झाल्या आणि ३,४९० बाळांचा सुखरूप जन्म झाला. यापैकी १,८११ मुले आणि १,६७८ मुली होत्या. विशेष म्हणजे, यात दोन बाळांना अस्पष्ट जननेंद्रिय ही दुर्मीळ वैद्यकीय समस्या आढळली. ही अत्यंत कमी प्रमाणात आढळणारी स्थिती असली, तरी बालरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली … Read more

अहिल्यानगरमधील राष्ट्रीय कबड्डीपटूवर क्रीडा प्रशिक्षकांकडून अत्याचार, दोन क्रीडा शिक्षकांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Ahilyanagar News : अहिल्यानगर- तालुक्यातील एका १७ वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटूवर अत्याचार झाल्याच्या गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन क्रीडा प्रशिक्षकांना अटक केली आहे. अंकुश बबन भेंडेकर (वय २४), शिवाजी निवृत्ती वाबळे (वय ५५, दोघेही रा. दहिगाव-ने, ता. शेवगाव) आणि रमेश शिवाजी गांगर्डे (वय २६, रा. बहिरोबाचीवाडी, ता. … Read more

जिल्हा परिषद प्रभाग रचना जाहीर! कर्जत-जामखेडमध्ये वाढले २ गट, गणसंख्या १५० वर

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचा नवा कार्यक्रम १३ जून २०२५ रोजी जाहीर झाला आहे. यंदा वाढीव लोकसंख्येनुसार जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या ७३ वरून ७५ आणि पंचायत समितीच्या गणांची संख्या १४६ वरून १५० करण्यात आली आहे. ही वाढ कर्जत आणि जामखेड तालुक्यांमध्ये झाली असून, यामुळे गावांच्या प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता … Read more

नेवासा तालुक्यात वादळाचा कहर! २६१ हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त, १५७ घरांची पडझड, शेतकऱ्यांचं कोट्यावधींचं नुकसान

Ahilyanagar News: नेवासा- तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.  या नैसर्गिक आपत्तीने तालुक्यातील ४३ गावांमध्ये २६१.८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान केले, तसेच १५७ कच्च्या-पक्क्या घरांचे आणि ५७ जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडाले. याशिवाय, तहाळा गावात तीन शेळ्या आणि एक वासरू मृत्यूमुखी पडले. कृषी आणि महसूल विभागाने तातडीने पंचनामे सुरू केली असून, आमदार विठ्ठलराव … Read more

शेवगाव तालुक्याला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा, केळी-पपईच्या शेकडो एकर बागा उद्ध्वस्त, घरांची पडझड तर अनेकांचे संसार उघड्यावर 

Ahilyanagar News: शेवगाव- तालुक्यातील दहिगावने, भावीनिमगाव, रांजणी, भातकुडगाव आणि शहरटाकळी या गावांना ११ आणि १२ जून २०२५ रोजी वादळी वारे आणि मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या केळी आणि पपईच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले, अनेक घरांचे पत्रे उडाले, सोलर प्लेट्स उद्ध्वस्त झाल्या आणि वीजपुरवठा दोन दिवसांपासून खंडित आहे. लक्ष्मीबाई शिंदे यांच्यासह काही … Read more

अहिल्यानगरच्या ‘या’ ग्रामपंचायतीने घेतला अभूतपूर्व निर्णय, शाळेत शिक्षक, विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर घातली बंदी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- तालुक्यातील सोनेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय यांनी संयुक्तपणे १२ जून २०२५ रोजी शिक्षक-पालक सभा घेऊन नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या नियोजनाचा आढावा घेतला. या सभेत शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा ठराव मंजूर झाला, ज्यामध्ये विशेषतः शालेय वेळेत मोबाइल वापरावर निर्बंध घालण्यावर भर देण्यात आला. … Read more

आरोपीला अटक न केल्यामुळे जवानाने तोफखाना पोलिस ठाण्यात टेबलावर डोके आपटून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न, गुन्हा दाखल

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील तोफखाना पोलिस ठाण्यात १३ जून २०२५ रोजी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली, जिथे राज्य राखीव दलातील एका जवानाने पोलिस निरीक्षकांच्या दालनात टेबलावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. या जवानाने आपल्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्याचा दबाव टाकला होता, आणि त्याच्या या कृत्यामुळे पोलिस ठाण्यात तणाव निर्माण झाला. या प्रकरणी जवानाविरोधात गुन्हा दाखल … Read more

शनिशिंगणापूर देवस्थानने १६७ कर्मचाऱ्यांना कामावरून टाकले काढून, ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांची भरती केल्यामुळे हिंदू समाज आक्रमक तर आज मोर्चाचे आयोजन

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थान हे हिंदू धर्मीयांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथील विश्वस्त मंडळाने १३ जून २०२५ रोजी तातडीच्या बैठकीत १६७ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये ११८ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयाला कारण म्हणून सतत गैरहजर राहणे आणि कामातील हलगर्जीपणा सांगण्यात आला आहे. मात्र, … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात १ लाख २३९ हेक्टरवर पेरणी पूर्ण, उडीद पिकाच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने खरीप हंगामाला लवकर सुरुवात केली आहे. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जमिनीत पुरेशी ओलावा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला आहे. १३ जून २०२५ पर्यंत जिल्ह्यात १ लाख २३९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून, यामध्ये उडीद पिकाने सर्वाधिक २५ हजार हेक्टर क्षेत्र व्यापले आहे. जून महिन्यात आतापर्यंत … Read more

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! साईबाबांच्या मंदिरात हार-फुल नेण्यास परवानगी, फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Ahilyanagar News: शिर्डी- येथील साईबाबा संस्थानने साईभक्तांना मंदिरात हार आणि फुले नेण्यास परवानगी दिल्याने राहाता तालुका आणि शिर्डी परिसरातील फूल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे शेतकऱ्यांना आणि स्थानिक व्यावसायिकांना आर्थिक लाभ होईल, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी भारत-पाक तणाव आणि साईबाबा संस्थानला … Read more