Gold Storage: भारतात 24000 टन सोन? भारतातच लपलय सोन्याचे रहस्य… हे धक्कादायक सत्य तुम्हाला हादरवून टाकेल!

Published on -

Gold Storage:- भारत हा देश सोन्यासाठी प्रसिद्ध आहे, हे आपण सर्वजण जाणतो. पूर्वीपासून भारताला “सोने की चिडिया” म्हटले जायचे आणि त्याचे कारण म्हणजे येथे मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा असणे. पूर्वीच्या काळात राजा-महाराजांकडे, राजवाड्यांमध्ये आणि मंदिरांमध्ये सोन्याची प्रचंड संपत्ती साठवलेली असायची.

आता काळ बदलला आहे, पण सोन्याचं महत्त्व अजूनही कमी झालेलं नाही, उलट ते अजून वाढलेलं आहे. आजही अनेक कुटुंबं, विशेषतः महिलांमध्ये सोन्याचे दागिने असणे ही प्रतिष्ठेची बाब समजली जाते. पण अलीकडील एका अहवालानुसार, भारतात सोन्याच्या साठ्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भारताकडे असलेला सोन्याचा साठा

फायनान्शियल एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारकडे ८७६ टन सोन्याचा साठा आहे. हा साठा राष्ट्रीय रिझर्व म्हणून वापरला जातो. पण खरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य जनतेकडे सरकारी साठ्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सोनं आहे.

अंदाजे भारतात जनतेकडे जवळपास २४,००० टन सोनं आहे. म्हणजेच जगभरातील सेंट्रल बँकांकडे जितकं सोनं आहे, तितकंच फक्त भारतीय नागरिकांकडे आहे. हे खूप मोठं प्रमाण आहे. यामध्ये दागिने, नाणी, सोन्याचे शिक्के आणि इतर स्वरूपातील गुंतवणुकीचा समावेश होतो. चीन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून तिथे लोकांकडे सुमारे २०,००० टन सोनं आहे.

आर्थिक गुंतवणुकीसाठी सोने फायदेशीर

सोनं हे फक्त शोभेचं दागिनं नसून, आर्थिकदृष्ट्या सुरक्षित गुंतवणूकही आहे. आजच्या घडीला जेव्हा बाजार चढ-उतार अनुभवतो आहे, अनेक देशांमध्ये मंदीचे वातावरण आहे, तेव्हा सोन्याकडे “सेफ इन्व्हेस्टमेंट” म्हणून पाहिलं जातं. अमेरिकेकडे सगळ्यात जास्त सोनं आहे – सुमारे ८,१३४ टन. त्यानंतर जर्मनी, चीन आणि मग भारत. पण जर नागरिकांच्या हिशोबाने पाहिलं, तर भारत अग्रेसर ठरतो.

सध्या सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ

सध्या भारतात सोन्याची किंमतही झपाट्याने वाढते आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ९५,२४० रुपये इतकी आहे आणि लवकरच हे दर १ लाख रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जातो.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर वाढतच आहेत. तिथे १ औंस सोनं सध्या ३,३३३ डॉलर दराने विकले जाते. गेल्या एका वर्षात सोन्याने जवळपास ४०% परतावा दिला आहे, जो इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा चांगला आहे.

तज्ज्ञ सांगतात की, आपल्या एकूण उत्पन्नातील किमान १० टक्के भाग आपण सोन्यात गुंतवावा. म्हणजेच तुम्ही अंगठी, चैन, शिक्का किंवा सोन्याचा बॉन्ड काहीही घेतलं, तरी ते केवळ दागिना नसून, तुमचं भविष्य सुरक्षित करणारा पर्याय आहे. अनेकदा लोक सोनं फक्त लग्नासाठी, सण-समारंभासाठी घेतात, पण आता याकडे आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीनेही पाहायला हवं.

तर, पुढच्या वेळेस तुम्ही सोनं खरेदी करायला गेलात, तर त्याला फक्त सौंदर्यदृष्टीने नाही, तर तुमच्या भविष्याच्या आधारस्तंभ म्हणूनही बघा. कारण भारतात सोनं हे फक्त परंपरा नाही, तर भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचं हत्यार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News