भारतीय रेल्वेने आता टिकट बुकिंगसाठी एक नवीन आणि अत्याधुनिक पाऊल उचलले आहे. अनेक फेक आणि बोगस खात्यांवर आवर घालण्यासाठी रेल्वेने AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित प्रणाली विकसित केली आहे. या यंत्रणेमुळे आधार पडताळणी न केलेली लाखो खाती बंद होऊ लागली आहेत. IRCTC च्या या मोठ्या कारवाईत तुमचे खातेही बंद होणार का, हे वेळेत जाणून घेणे आवश्यक आहे.
गेल्या 6 महिन्यांत भारतीय रेल्वेने सुमारे 2.4 कोटी IRCTC खाती बंद केली आहेत. ही कारवाई फक्त फेक खाती, बॉट्सने बुक केलेली खाती, तसेच आधार पडताळणी न केलेल्या खात्यांवर करण्यात आली आहे. यामध्ये टिकट एजंट्सच्या किंवा नियमबाह्य वापरकर्त्यांच्या खात्यांचा समावेश आहे.

IRCTC अॅपवर सध्या 13 कोटींहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आहेत, परंतु त्यातील फक्त 1.2 कोटी खाती आधारद्वारे व्हेरीफाईड आहेत. उरलेल्या सर्व खात्यांवर बारीक लक्ष ठेवले जात असून कोणतेही संशयास्पद वर्तन आढळल्यास ते थेट बंद केले जात आहे.
AI मॉनिटरिंग टूल-
रेल्वेने विकसित केलेले AI मॉनिटरिंग टूल वापरकर्त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवते. जर कोणी एका IP वरून वारंवार बुकिंग करत असेल, एका सेकंदात अनेक विनंत्या करत असेल किंवा खाते आधारने सत्यापित नसेल, तर ते खाते त्वरित “सस्पेक्टेड” म्हणून चिन्हित होते आणि ते हटवले जाते.
खाते सुरक्षित ठेवण्यासाठी ‘हे’ करा
जर तुम्ही IRCTC चा वापर करून तिकीट बुक करत असाल, तर कहो गोष्टी त्वरित करा. यामध्ये सर्वप्रथम आधार पडताळणी पूर्ण करा. IRCTC च्या वेबसाइट किंवा अॅपवर जाऊन KYC विभागात जाऊन तुमचा आधार क्रमांक लिंक करा. तसेच एकच खाते वापरा, अनेक खाती बनवू नका. यामुळे तुमचे खाते सस्पेंड होऊ शकते.
बॉट सॉफ्टवेअर किंवा एजंट पद्धतीने बुकिंग करू नक. अशा प्रकारचे बुकिंग AI सिस्टमद्वारे लगेच ओळखले जाते. याचबरोबर सतत लॉगिन-लॉगआउट टाळा. सस्पिशस अॅक्टिविटी म्हणून हेही नोंदवले जाते. IRCTC कडून आलेले अधिकृत अपडेट्स लक्षात ठेवा. चुकीच्या लिंक किंवा फेक SMS वर क्लिक करू नका.
रेल्वेच्या या कडक पॉलिसीमुळे आधार पडताळणी न केलेली खाती थेट बंद केली जात आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं IRCTC खाते टिकवायचं असेल, तर उशीर न करता आजच ते आधारने व्हेरीफाय करा. अन्यथा तुमचे खातेही बंद केले जाऊ शकते.