नवी दिल्ली : देशात मागील ६ वर्षांपासून रोजगारात सर्वात मोठी घट नोंदवली आहे. एका नव्या अध्ययनानुसार, मागील ६ वर्षांत रोजगारात जवळपास ९० लाखांनी घट आलेली असल्याचे म्हटलेले आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या रोजगाराच्या घसरणीला सामोरे जावे लागत आहे.
२०११-१२ ते २०१७-१८ च्या दरम्यान भारतात रोजगाराच्या संधीमध्ये घट आली आहे. हा अहवाल संतोष मेहरोत्रा आणि जे.के. परिदा यांनी तयार केलेला आहे. मेहरोत्रा आणि परिदा यांच्या मते, २०११-१२ ते २०१७-१८ च्या वर्षात एकूण रोजगारात जवळपास ९० लाखांनी घट झालेली आहे.

भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलेले आहे. ऑटोमोबाईल्स, सिमेंट, लोखंड उद्योगांवर संक्रात आल्यापासून देशातील एकूणच उत्पादनात कमालीची घसरण पहायला मिळत आहे. बाजारात मागणीच नसल्यामुळे अनेक कंपन्यांनी उत्पादन थांबवले असून काही कंपन्यांनी अतिरिक्त साठा करण्यासही नकार दिला आहे. दुसरीकडे रोजगार क्षेत्रातही मंदी निर्माण झाल्याने देशासमोर येत्या बेरोजगारांचे करायचे काय असा प्रश्न निर्माण होणार आहे.
- पूर्व जन्माचे कर्मफळ घेऊन जन्मतात ‘या’ मूलांकचे लोक! जन्मतारखांनुसार ओळखा कसे असेल तुमचे भविष्य?
- 508 किमी प्रवास अवघ्या 3 तासांत! देशातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी सुरू होणार?, रेल्वेमंत्र्यांनी दिली सर्व अपडेट
- महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसला 27 जुलैपासून एक अतिरिक्त थांबा मंजूर ! वेळापत्रकात झाला मोठा बदल
- फक्त मांसाहारी नाही, शाकाहारी अन्नातूनही मिळते 20 ग्रॅमपर्यंत प्रोटीन! पाहा ‘प्रोटीन बूस्ट’ देणारे 5 सुपरफूड्स
- अहिल्यानगरच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ‘बेंगलोर’ मार्केटने घातली भुरळ, कांदा विक्रीसाठी बेंगलोर मार्केटला शेतकऱ्यांची पसंती