केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवत असते. प्रत्येक घटकाचाच सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील असते. आता याच पार्श्वभूमीवर प्रत्येक गरीबाला कायमस्वरूपी घर देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
गरिबांना कायमस्वरूपी घरे मिळावीत यासाठी मोदी सरकार मोठी पावले उचलत असून, यामुळे दरवर्षी लाखो लोकांना मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी घरे मिळणार आहेत. यासाठी मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजना लागू केली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळे निकष आहेत, जे तुम्हाला माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुम्हाला आणखी काही महत्त्वाच्या अटी माहित असणं गरजेचं आहे, चला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
या नागरिकांना मुंबईत गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळणार
पंतप्रधान आवास योजनेत आता गरीबाला कायमस्वरूपी घरे दिली जात आहेत. त्यासाठी काही आवश्यक अटींसह तुम्ही अर्ज करू शकता. आता मुंबईतील दुर्बल घटकांसाठीचा वार्षिक उत्पनाचा निकष ६ लाख रुपये करण्यात आला आहे.
तुम्ही जर यात बसत असाल तर पक्क्या घरासाठी आरामात अर्ज करू शकता.
कुटुंबातील कोणताही सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यात पती, पत्नी, अविवाहित मुली आणि मुलांचा समावेश असू शकतो. अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे कायमस्वरुपी घर नसावे. कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याच्या नावावर कायमस्वरूपी घर नसावे.
योजनेशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टी
केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक गरीबाला कायमस्वरूपी घर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेत 31 मार्च 2022 पर्यंत सुमारे 20 दशलक्ष लोकांसाठी परवडणाऱ्या किमतीत घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आता हे उद्दिष्ट 2.95 कोटी घरांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.