अहमदनगर ब्रेकिंग– शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी औषध सेवन करून संपविली जीवनयात्रा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- नगर तालुक्यातील ससेवाडी येथील शेतकरी कर्जाला कंटाळून दिलीप अण्णा मगर (वय 53) यांनी कर्जाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ससेवाडी येथील शेतकरी दिलीप मगर यांना ७ एकर जमीन असून त्यांच्याकडे सोसायटी व विविध बँकांचे कर्ज होते.

नैसर्गिक आपत्ती व गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे अस्मानी व तुलतानी संकटात सापडल्याने ते कर्ज फेडू शकले नाहीत.

कांदा लागवडीसाठी उत्पन्नाच्या भरवशावर कर्ज काढून कांदा लागवड केली. परंतु हवामानाने साथ न दिल्याने झालेला खर्च देखील वसूल न झाल्याने मगर यांनी कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपवली.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!