Gram Suraksha Yojana : देशातील कोट्यवधी लोकांना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून गुंतवणुकीचा फायदा होत असून चांगला परतावा मिळत आहे. अनेकजण त्यांचे पैसे सुरक्षित आणि चांगल्या परताव्यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवत आहेत.
अशातच भारतीय पोस्ट ऑफिस वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजना आणत असते ज्यामुळे ग्राहकांना त्याचा चांगला फायदा मिळतो. ग्राम सुरक्षा योजना ही अशीच एक योजना असून तुम्ही यात दररोज केवळ 50 रुपयाची गुंतवणूक केली, तर तुम्ही 35 लाख रुपये मिळवू शकता.

या योजनेंतर्गत, वयाची 80 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या पॉलिसीचे 35 लाख रुपये व्यक्तीला परत देण्यात येतात. तसेच, काही विशिष्ट परिस्थितीत, गरजेच्या वेळीही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढता येतात.
तुम्हाला 55 वर्षांच्या गुंतवणुकीवर एकूण 31 लाख ६० हजार रुपये मिळतील. तर दुसरीकडे, 58 वर्षांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 33 लाख 40 हजार तसेच 60 वर्षांच्या गुंतवणुकीवर 34 लाख, 60 हजार रुपये मुदतपूर्तीच्या वेळी मिळतील.
या योजनेत भारतातील वय 19 ते 35 वर्षे दरम्यान असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अर्ज करून गुंतवणूक करता येते.
तसेच तुम्हाला 10 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध असते. या योजनेंतर्गत, जर गुंतवणूकदाराचा वयाच्या 80 व्या वर्षी मृत्यू झाला तर उत्तराधिकार्याला बोनससह संपूर्ण रक्कम देण्यात येते.