भाजपकडून मनसेचा फक्त वापर, मात्र राज ठाकरेंच्या जवळ जायला भाजप घाबरते; जयंत पाटील

Published on -

मुंबई : आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसची (Ncp) परिवार ‘संवाद यात्रा’ सुरू होत असून दौर्‍यावर जाण्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी माध्यमांशी (Media) संवाद साधला आहे.

मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उद्या ठाण्यात सभा होणार असून आज जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांना डिवचल्याचे समजते आहे.

ते म्हणाले की, मुंबईमध्ये (Mumbai) मनसेला जवळ केल्यावर भाजपला किती मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज त्यांना आला असेल म्हणूनच सध्या भाजपकडून मनसेचा (mns) फक्त वापर चालू आहे, अशी जोरदार टीका यावेळी जयंत पाटील यांनी केली आहे.

तसेच मनसेची तशीही मते भाजपला (Bjp) मिळणार नाहीत म्हणून मनसेच्या जवळ जायला भाजप घाबरत आहे. भाजपची मनसेला जवळ करण्याची पूर्वीपासूनची फार इच्छा आहे. पण अजून त्यांनी ते धाडस केलेले नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या आंदोलनावर बोलताना पाटील म्हणाले, आंदोलनाला खतपाणी कुणी घातले.. त्या आंदोलनात प्रक्षोभक भाषणे कुणी केली? न्यायालयाच्या निर्णयानंतर पेढे वाटणारे कोण होते?

याचा शोध घेण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच या प्रकरणाचा गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील सक्षमपणे तपास करून कडक कारवाई करतील, अशी खात्रीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News