अल्पवयीन मुलीचा शोध लवकर लावण्याची मागणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- श्रीरापमूर तालुक्यातील बेलापूर या गावामधील एका १४ वर्षीय मुलीला त्याच गावातील २२ वर्ष वयाच्या तरुणाने २३ जुलै रोजी पळवून नेले आहे.

सतरा दिवस उलटूनही तपास न लागल्याने शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता.

या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा लवकर शोध लागावा यासाठी सोमवार ९ ॲागस्ट रोजी सकाळी ११ वाजता शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने पोलिस स्टेशनवर मोर्चा नेण्यात आला होता.

शहर पोलिसांकडून लवकरच मुलीचा शोध घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News