पत्नीने मारलं तरी ‘ते’ म्हणतील की यात केंद्र सरकारचाच हात आहे..!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :-  राज्यातील सरकार इतकं लबाड आहे की काहीही झालं तरी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मला तर असं वाटतंय की यांच्या पत्नीने जरी मारलं तरी सांगतील की केंद्र सरकारचा हात आहे, असे लबाड लोक इथं आहेत.

असा टोला भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी इथं देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची पुरेशी रक्कम मिळालेली नाही.

आपल्या सरकारच्या काळात आपण किती रक्कम प्रत्येक जिल्ह्याला दिली होती, हे सांगत राज्य सरकार स्वतः भ्रष्टाचार करत आहे आणि मदत द्यायची वेळ आली की केंद्राकडे बोट दाखवत आहे.

राज्याने गेल्या वर्ष-दीड वर्षात अनेक नैसर्गिक आपत्ती बघितल्या. वादळ, अतिवृष्टी, महापूर या सगळ्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झालं. याची सर्वाधिक झळ बसली ती बळीराजाला.

या नुकसानीची भरपाई योग्य त्या प्रमाणात न मिळाल्याने विरोधी पक्षाने आता चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी निवडणुकांमध्ये पीकविमा

आणि नुकसान भरपाईचा मुद्दा हा भाजपाच्या प्रचारातल्या मुद्द्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार असं चित्र दिसत आहे. याच मुद्द्यावरुन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर चांगलीच फटकेबाजी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!