Good News : आता सर्वांनाच मिळतील सरकारी योजनांचे पैसे ! बँकाही करणार नाहीत टाळाटाळ, मोदी सरकार करतंय ‘असे’ काही

Published on -

केंद्र आणि राज्य सरकारकडून देशभरात अनेक योजना राबविल्या जात आहेत. सर्व योजनांचा लाभ गावोगावी पोहोचविण्यासाठी सरकार अनेक उपक्रम राबवित आहे.

सध्या केंद्रसरकारच्या आर्थिक योजना शेतकरी, व्यापारी, फेरीवाल्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम राष्ट्रीयीकृत बँका चांगले करीत आहेत, मात्र खासगी क्षेत्रातील बँकांनी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी केले.

सरकार अनेक आर्थिक योजना राबवत आहे :- विदर्भातील आर्थिक समावेशनाच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना कराड म्हणाले की, शेतकऱ्यांसारख्या गटांसाठी पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री स्वनिधी निधी योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या सारख्या योजना मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.

व्यापारी व फेरीवाले व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून अनेक आर्थिक योजना राबविल्या जातात. या आर्थिक योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यात राष्ट्रीयीकृत बँका महत्त्वाची भूमिका बजावतात, मात्र खासगी क्षेत्रातील बँका अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत.

खासगी बँकांसोबत होणार बैठक :- या महिन्याच्या अखेरीस खासगी बँकांसोबत बैठक घेऊन त्यांना यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

50 कोटींहून अधिक झिरो बॅलन्स खाती उघडली :- कराड म्हणाले की, प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत आतापर्यंत 50 कोटींहून अधिक झिरो बॅलन्स बँक खाती उघडण्यात आली आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रातील नॉन परफॉर्मिंग अॅसेट (NPS) देखील कमी होत आहेत.

अर्थ मंत्रालयाची बँकांसोबत बैठक :- कराड म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात सरकारच्या आर्थिक योजना शेवटच्या टप्प्यात पोहोचाव्यात यासाठी अर्थ मंत्रालय बँकांसोबत बैठका घेत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News