मुंबई : राज्यातील वातावरण मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे. त्यात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा आजपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता.
अशातच भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र ट्विट (Twit) केले आहे त्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
ते म्हणाले, हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केल्यावर महाविकास आघाडी सरकारने एक खासदार व एका आमदारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला.
"कायदे मोडणाऱ्यांना साथ देणं मविआनं बंद करावं!"@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/DgnJ075tUb
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) May 3, 2022
आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, असे सांगणाऱ्यांवर आघाडी सरकार कारवाईचा वरवंटा फिरवत आहे. महाविकास आघाडी सरकारने कायदा मोडणाऱ्यांना साथ देणे बंद करावे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
पत्रकात चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले आहेत की, महाविकास आघाडीने संविधानाची चौकट ओलांडणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने लाऊड स्पीकरच्या वापरावर निर्बंध घातले आहेत,
त्याचे पालन करावे असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देशासाठी कायदा असतो. त्याचे पालन करण्याचे आवाहन करणाऱ्या राज ठाकरे यांच्या विरोधात आघाडी सरकारने गुन्हा दाखल केला आहे.
उलट या आदेशाचे उल्लंघन करून लाऊडस्पीकरचा वापर करणाऱ्यांच्यावर कारवाई टाळून राज्य सरकार कायदा मोडणाऱ्यांना साथ देत आहे. आघाडी सरकारची भूमिका कायद्याचे राज्य ही संकल्पना उधळून लावणारी व संविधानाचा अपमान करणारी आहे.
सत्तेच्या जोरावर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना साथ देणे म्हणजे राज्यात अराजक निर्माण करणे आहे. भारतीय जनता पार्टी याचा निषेध करते.
महाविकास आघाडी सरकारने संविधानाचा आदर केलाच पाहिजे व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलेच पाहिजे, अशी आपली मागणी आहे असेही पाटील यांनी पत्रकात म्हंटले आहे.