मलिक, देशमुख यांची पुन्हा कोर्टात धाव, केली ही मागणी

Published on -

Maharashtra news :राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्यावेळी मतदान करण्यास कोर्टाने परवानगी नाकरली असूननही तुरूंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

उद्या राज्य सरकारविरोधात करण्यात येत असलेल्या बहुमत चाचणीच्यावेळी मतदान करण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका त्यांनी दाखल केली आहे.विधान परिषद निवडणुकीच्यावेळी त्यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती.

थेट निव़णुकीत सामान्य नागरिकाने मतदान करणे आणि अप्रत्यक्ष निवडणुकीत आमदाराने मतदान करणे वेगळे आहे. त्यामुळे दोघांसाठी वेगळा नियम हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही याचिका प्रलंबंधित आहे. त्यालाच जोडून आज त्यांनी नवीन हा अर्ज केला आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe