Maharashtra Politics: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना मृत म्हटले होते. त्यांची प्रेतेच इकडे येतील, असेही राऊत यांनी म्हटले होते.
यावरून त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. त्यानंतर याच वक्तव्याला पुष्टी देणारे ट्विट राऊत यांनी पुन्हा केले आहे.त्यांनी ट्विटरवर म्हटलं की,”जहालत एक किस्म की मौत है और जाहिल लोग चलती फिरती लाशें है.”

आगतिकता हा एक प्रकारे मृत्यू असून आगतिक लोक हे चालते फिरते मृत्यू असतात, असे राऊत यांना म्हणायचे आहे. यातून त्यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.