आता हा कसा शकून म्हणायचा? त्या शिक्षकांसोबत झाले असे…

Published on -

Maharashtra News:शुभाशुभ आणि अपवित्र अपवित्र या गैरसमजातून मसिक पाळी आलेल्या विद्यार्थिनीला शाळेतील वृक्षारोपणाच्या उपक्रमापासून रोखणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीच एक घटना घडली आहे.

बुधवारी सकाळी आश्रम शाळेतील हे शिक्षक शाळेत येत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. यामध्ये तिघे जखमी झाले आहेत. आता हा कसला शकून म्हणायचा? अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुलीला वृक्षारोपणापासून अडविल्यानंतर या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. चौकशीचे आदेश झाले. त्यानुसार आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी बुधवारी भल्या पहाटे या शाळेत पोहोचले. त्यामुळे शिक्षकांची एकच पळापळ सुरु झाली.

नियमानुसार आश्रमशाळेतील शिक्षकांनी मुख्यालयात राहणे बंधनकारक असते. मात्र, अनेक शिक्षक आपापल्या घरून येऊन-जाऊन करत असल्याचा प्रकार यावेळी समोर आला. प्रकल्प अधिकारी शाळेत पोहोचले तेव्हा अनेक शिक्षक घरी होते.

अधिकारी आल्याचे समजताच हे शिक्षक तातडीने शाळेकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी देवगाव घोटी रस्त्यावर शिक्षकांच्या कारला अपघात झाला. या अपघातामध्ये कार पलटी झाली. यामध्ये आश्रमशाळेतील तीन शिक्षिका जखमी झाल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!