PM Awas Yojana: आज देखील देशात लाखो लोक आहे ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही आहे. आज भारतात अनेक लोक आहे जे दुसरांच्या घरात भाडे देऊन राहतात. मात्र आता अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
केंद्र सरकार एक विशेष योजना अंतर्गत देशातील गरिबांना तब्बल 2 लाख पक्की घरे देत आहे. आम्ही तुम्हाला येथे पीएम आवास योजनाबद्दल माहिती देणार आहोत. या योजनेअंतर्गत तुम्हाला देखील घर मिळू शकतो चला तर जाणून घ्या या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.

हे दस्तऐवज असणे आवश्यक आहे
आधार कार्ड
मतदार ओळखपत्र
6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
पॅन कार्ड
जात प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
अटी आणि शर्ती
आहेत पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा कायमचा नागरिक असणे आवश्यक आहे. याशिवाय, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तसेच, सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील फक्त एक सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो. दुसरीकडे, जर कोणाकडे कार किंवा इतर चारचाकी असेल तर तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर विवरणपत्र भरत नाही.
या सुविधा मोफत उपलब्ध असतील
पीएम आवास योजनेंतर्गत मिळालेल्या घरांमध्ये वीज आणि पाण्याची जोडणी पूर्णपणे मोफत दिली जाईल. एवढेच नाही तर अपंग आणि अल्पसंख्याकांना योजनेचा लाभ घेण्यास प्राधान्य दिले जाईल. पीएम आवास योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करण्याची सुविधा आहे. सर्व अर्ज संबंधित विभागाकडून छाननीनंतर प्रमाणित केले जातात. त्यानंतर लाभार्थ्यांची यादी इंटरनेटवर टाकली जाते. तयार घराची चावी प्रौढ स्त्री किंवा घराच्या प्रमुखाकडे दिली जाते.
हे पण वाचा :- PAN Card : फक्त 2 दिवसात तुमचे पॅनकार्ड पोहोचेल घरी ! कुठेही न जाता अशा प्रकारे करा ऑनलाइन अर्ज ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया