राहुल गांधी मंदिरात जाऊ लागले..अरविंद केजरीवाल हनुमान चाळीसा म्हणू लागले; फडणवीसांचा टोला

Published on -

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विलेपार्ले येथील एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना चिमटा काढला आहे.

विलेपार्ले (Villeparle) येथील संन्यास आश्रम येथे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज सुवर्ण जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, “काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) देखील अलिकडे मंदिरात जाऊ लागले आहेत.

शिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हनुमान चाळीसा म्हणू लागले आहेत, असा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काढला आहे.

तसेच फडणवीस म्हणाले, “काहींना वाटत आहे की इंग्रजांनी जो इतिहास लिहिला तो योग्य आहे. परंतु, इंग्रजांना आपल्यावर आक्रमण करायचे होते, त्यामुळे त्यांनी तसा इतिहास लिहिला.

एकेकाळी मोठ-मोठ्या नेत्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटत होती. आम्ही तो काळ पाहिला आहे. कारण कुणी मंदिरात जाताना पाहिले तर आपली सेक्युलर मते जातील याची भीती होती. परंतु, स्वतःला सेक्युलर म्हणणारे आता मंदिरात जाऊ लागले आहेत.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News