Ahmednagar News : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. कांदा, गहू, उन्हाळी बाजरी, द्राक्षे, संत्रा, आंबे, केळी या पिकाची मोठी नासाडी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीपुढे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
गारपिटीच्या तडख्यातून भाजीपाला देखील सुटला नाही. पर्यायाने भाजीपाल्याचे आवक कमी झाली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस वब गारपीट होत आहे. जिल्ह्यातील अनेकांच्या घराचे पत्रे उडाले असून, काही शेतकऱ्यांच्या शेळ्या, कोंबड्या, जनावरे दगावली आहेत.

तर पिकांचे खूप नुकसान झाले आहे. उन्हाचा चटका वाढल्यामुळे तसेच आवक कमी होत असल्याने लिंबाचे दर चांगलेच वाढलेले आहेत. त्यातुलनेत कांद्याने मात्र शेतकऱ्यांची पुरती झोप उडवली आहे. यातच आता पावसामुळे भाजीपाल्याचे देखील खूप नुकसान झाले आहे.
पर्यायाने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर चांगलेच वधारले आहेत. मेथी,कोथिंबीरीची जुडी २० रूपयांना विकली जात आहे. अवकाळी पावसाने शेतात काढण्यास तयार असलेला गहू, कांदा तसेच बाजरी, केळी, मोसंबी, आंबा या पिकाची नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठा चिंतातूर झाले आहेत.
शेतकर्याला अद्याप मागील अनुदानच मिळाले नाही तोच पुन्हा त्याच्या नशीबी अस्मानी संकटाला तोंड देण्याची पाळी आली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
यामुळे बळीराजाचे शेतातील उभे पिके जमीनदोस्त झाले आहे. यातच सध्या शेतमालाला भाव नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा हे मोठे संकट आले आहे.