UPSC Interview Questions : यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
दरम्यान, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. कारण या बातमीमध्ये आम्ही काही महत्वाच्या प्रश्नांची यादी दिलेली आहे.
त्यामुळे जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
प्रश्न : पुलर लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : नागपूर जिल्हा
प्रश्न : निवडणुकीचा प्रचार किती तास अगोदर थांबविला जात असतो?
उत्तर : ४८ तास
प्रश्न : महाराष्ट्रातुन डाळिंबाचे निर्यात करणारे कोणते जिल्हे आहेत?
उत्तर : अहमदनगर, सोलापूर, सांगली
प्रश्न : महाराष्ट्रातुन कांद्याचे निर्यात करणारे कोणते जिल्हे आहेत?
उत्तर : अहमदनगर, पुणे, नाशिक
प्रश्न : भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते?
उत्तर : २४ वे तीर्थंकर होते.
प्रश्न : सरकारी नोकरीमध्ये तृतीय पंथीयांना आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर : कर्नाटक राज्य