ATM UPDATE : जर तुम्ही ATM मध्ये जाऊन पैसे काढले असतील तर तुम्हाला माहीतच असेल की तुम्ही पैसे काढल्यानंतर नेहमी कॅन्सलचे बटण दाबता. यामुळे तुम्ही सुरक्षित व्यवहार करत आहे असेल तुम्हाला वाटते.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण व्यवहार करताना कॅन्सल बटनवर क्लिक केल्यानंतर आपण सुरक्षितरित्या पैसे काढले आहेत असे आपल्याला वाटत राहते. म्हणजेच यानंतर कोणीही पासवर्ड टाकल्याशिवाय आपल्या अकाऊंट मधून पैसे काढू शकत नाही असा विचार आपण करत असतो.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/04/ahmednagarlive24-fd2d317b-5379-49b7-a58d-e77adcdebcd1.jpeg)
गेल्या काही वर्षांपूर्वी कॅन्सल बटण बाबतीत एक पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये कॅन्सल बटन हे नंतर नाही तर अगोदर दाबण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामध्ये लिहिले होते की, जर आपण एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले असाल तर कार्ड मशीनमध्ये टाकण्यापूर्वी कॅन्सल बटण दोन वेळेस दाबा.
या पोस्टमध्ये असंही छापण्यात होतं की, पासवर्ड चोरण्यासाठी या अगोदर कोणी सेटअप लावला असेल तर तो आपोआप रद्द होईल. ही पोस्ट त्यावेळेस आरबीआयची आहे म्हणून व्हायरल झाली होती..
सरकारला या पोस्ट संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे
त्यावेळी ही पोस्ट संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरली होती. यानंतर या पोस्ट बाबत सरकारला यावर स्पष्टीकरण सुद्धा द्यावं लागलं. PIB ने या पोस्टचे फॅक्ट चेक केले आणि ती पोस्ट खोटी असल्याचं सांगितलं. PIB ने ट्विटरवर लिहिले, ‘RBI च्या नावाने चालवल्या जाणार्या बनावट पोस्टचा अशा प्रकारचा दावा आहे की एटीएममध्ये व्यवहार करण्यापूर्वी दोन वेळेस कॅन्सल बटण प्रेस केल्याने पासवर्ड चोरी टाळली जाते.
परंतु हे पूर्णपणे खोटं विधान आहे तसेच भारतीय रिझर्व बँकेने ने जारी केलेले नाही.’ भारतीय रिझर्व बँकेने पुढे व्यवहार सुरक्षित ठेवण्या करीता 2 पर्यायाचा उल्लेख केला आहे. पहिला- आपला व्यवहार पूर्ण privacy ने करा त्याचबरोबर दुसरे- आपल्या जवळच्या कार्डवर पिन कोड कधीच लिहू नका.
एटीएम ताबडतोब डिलीट करते आपली माहिती
आपला व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कुठलेही एटीएम कार्ड बाबतची सर्व माहिती पूर्णपणे डिलीट करते. यामुळे आपण कॅन्सल बटणवर क्लिक केलं नाही तरीही आपली माहिती त्या ठिकाणी सेव्ह होणार नाही.
परंतु, काही ATM मध्ये आपल्याला ट्रांझेक्शन सुरू ठेवण्यास सांगितले जाते. या बाबत नक्कीच कॅन्सल करा. यासोबतच, आपला व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तसेच मशीनवर होम स्क्रीन पुन्हा एकदा दिसू लागल्यावर आपल्याला कॅन्सल बटण दाबण्याची गरज नाही.