मोठी बातमी ! राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढती गर्दी आणि रुग्णसंख्या पाहता निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार राज्यसरकारने केला आहे.

राज्यातील वाढता कोरोनाचा pआकडा पाहता प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या राज्यात दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने राज्य सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात तासभर बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि मुख्य सचिवही उपस्थित होते.

राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्याच्या सरकार विचारात नाही

– लॉकडाऊनऐवजी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार

– राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांच्या उपस्थिती ७५ ते ५० टक्क्यांवर आणली जाण्याची शक्यता

– शक्य असेल त्या खासगी कार्यालयात वर्क फ्रॉम होम लागू करण्याची शक्यता

– दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा कमी केल्या जाण्याची शक्यता

– राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर आणखी निर्बंध

– आरोग्यसेवा सज्ज ठेवण्याची सरकारची तयारी

– मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार

बैठकीतील महत्वाचे मुद्दे

राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत राज्य सरकारचा नकारात्मक

नाईट कर्फ्यूची घोषणेवर सरकार विचार करणार

दिल्ली, कर्नाटक प्रमाणे ‘वीकएंड कर्फ्यू’संदर्भात प्रस्ताव विचाराधीन

दुसरा डोस राहिलेल्या नागरिकांचं लसीकरण वेगाने होणार

राज्यातील सर्वांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी सरकार गती वाढवणार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News