Janjira Fort :- समुद्राच्या गर्भात एक असे रहस्य लपले आहे, जे तीनशेहून अधिक वर्षांपासून उलगडले गेलेले नाही. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात मुरुड गावाच्या सागरी किनाऱ्यालगत वसलेला मुरुड-जंजिरा किल्ला, केवळ एका ऐतिहासिक वास्तूचा नाही, तर एक अजिंक्य पराक्रमाचा साक्षीदार आहे. तो एक गूढतेने भरलेला समुद्रकिल्ला आहे, जो आजवर कोणीही जिंकू शकलेला नाही. इतकेच नव्हे, तर या किल्ल्याच्या बांधणीतील शौर्य, त्याचा अदृश्य दरवाजा आणि शास्त्रज्ञांनाही बुचकळ्यात टाकणारी संरचना हे सर्वच आपल्या मनात रोमांच उभे करतात.
कसा आहे मुरुड-जंजिरा किल्ला?
मुरुड-जंजिरा किल्ला समुद्राच्या हृदयात, सुमारे ९० फूट उंचीच्या बेटावर उभा आहे. चारही बाजूंनी अथांग पाण्याने वेढलेला हा किल्ला पाहताना एखाद्या भव्य जलरथाचा भास होतो. त्याची रचना इतकी अचूक आणि काटेकोर होती की,

कितीही सामर्थ्यवान सैन्य आले, तरीही कोणीही त्याच्यावर कब्जा मिळवू शकले नाही. इतिहास साक्ष देतो की पोर्तुगीज, मुघल, ब्रिटिश आणि मराठा अशा अनेक बलाढ्य साम्राज्यांनी या किल्ल्यावर हल्ले चढवले, पण यश कधीच त्यांच्या नशिबी आले नाही.
किल्ल्याची सर्वात रहस्यमय गोष्ट
या किल्ल्याची सर्वात रहस्यमय गोष्ट म्हणजे त्याचा दरवाजा. ज्या क्षणी एखादा शत्रू समुद्रातून जवळ येतो, त्याच क्षणी हा दरवाजा भिंतीत मिसळून जातो आणि पूर्णपणे अदृश्य होतो. ही रचना इतकी क्लिष्ट आणि हुशारीने बांधलेली आहे की तेव्हाचे तंत्रज्ञान आजच्याही अभियंत्यांना थक्क करून टाकेल.
किल्ल्याच्या सुरक्षेसाठी २२ वेगवेगळ्या चौक्या उभारल्या गेल्या होत्या आणि प्रत्येकावर मजबूत तोफा बसवण्यात आल्या होत्या. मलिक अंबरच्या देखरेखीखाली हे भव्य बांधकाम सुरू झाले आणि पुढे सिद्दी राजवटीत किल्ला अधिक बळकट झाला.
४० फूट उंचीची भिंत
सिद्दीकांच्या ताब्यात असलेला हा किल्ला त्यावेळी सैनिकी दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. आजही इथे ‘कलाल बांगडी’सारख्या जुन्या, पण प्रभावी तोफा पाहायला मिळतात.
या तोफांचे वजन आणि त्यांची बनावट पाहूनच किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेचा दर्जा समजतो. या सगळ्या संरचनेभोवती पसरलेली सुमारे ४० फूट उंचीची भिंत, म्हणजेच किल्ल्याचे खरे रक्षणकवच. समुद्राच्या प्रचंड लाटा असो की शत्रूंचे आक्रमण, या भिंती कधीच ढळल्या नाहीत.