राहुरी :- अपघातात ठार झालेल्या तरुणाच्या शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना तब्बल १० तासांहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागल्याने ग्रामीण रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला.
तालुक्यातील म्हैसगाव येथील सुरेश श्रीरंग नेहे (वय ३५) यांचा मंगळवारी रात्री १० च्या सुमारास म्हैसगाव-राहुरी मार्गावरील केदारेश्वर घाटात अपघात होऊन ते ठार झाले.
नेहे यांचा मृतदेह रात्री पावणेअकरा वाजता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनासाठी नेहे यांच्या नातेवाईकांना बुधवारी सकाळी नऊपर्यंत मृतदेहाला राखण बसावे लागले. सकाळी कार्यकर्त्यांनी हा गंभीर प्रकार आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कानावर घातला.
त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील डाॅक्टरांशी फोनवर संपर्क साधत शवविच्छेदन केंद्रात बोलावून घेत कामाच्या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे खडेबोल सुनावले. असा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
अपघातात ठार झालेल्या, तसेच इतर घटनांत मृत्यू पावलेल्यांच्या शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना तास-तास प्रतीक्षा करावी लागण्याची दुर्दैवी वेळ यापूर्वी अनेकांवर आली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक याकडे गांभीर्याने पहात नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. शवविच्छेदन केंद्रात ओळख पटवण्यासाठी ठेवलेल्या मृतदेहाचे उंदीर व घुशीने लचके तोडल्याचे प्रकार घडलेले असताना या केंद्राची दुरवस्था ‘जैसे थे’च आहे.
- अहिल्यानगर बाजार समितीत भाजीपाल्याच्या दरात वाढ; वांगे, कारले, दोडका आणि शेवग्याच्या शेंगा महागल्या
- डी मार्टपेक्षा स्वस्त सामान कुठं मिळत ? हे आहेत टॉप पाच पर्याय
- महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठा बदल ! 1 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?
- अहिल्यानगरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोषण आहारात मोठा घोटाळा, संभाजी ब्रिगेडने केला भ्रष्टाचाराचा भांडाफोड!
- महाराष्ट्रातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षणाधिकारी यांच्याकडून महत्त्वाचे परिपत्रक जारी