पुणे :- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गोहत्यांबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारत कृषी गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.
या वेळी राजे शिवराय प्रतिष्ठानचे शिवाजी खरात, विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्ष विभागाचे शिवांकुर खेर, योगेश शेटे, मानद पशु कल्याण अधिकारी गोरक्षण विभागाचे शिवशंकर स्वामी आदी उपस्थित होते. एकबोटे म्हणाले,’ गोहत्येला प्रोत्साहन देणारे वक्तव्य दानवेंसारख्या जबाबदार व्यक्तीने करणे योग्य नाही.

त्यांच्या या वक्तव्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची भावना आहे. याबाबत दानवेंचा निषेध करण्यासाठी गुरुवारी दुपारी ४ वाजता जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.
- शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन 100% मालामाल बनवणार ! ‘या’ 5 मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव, पिवळ्या सोन्याचे लेटेस्ट रेट चेक करा….
- प्रतीक्षा संपली ! बॉक्स ऑफिस गाजवलेला दशावतार चित्रपट ‘या’ तारखेला OTT वर रिलीज होणार, कुठं पाहणार चित्रपट ?
- महार वतनाची जमीन म्हणजे कोणती जमीन ? भारतीय कायद्यानुसार अशा जमिनी विकता येतात का ? वाचा डिटेल्स
- Post Office ची ही योजना ठरणार गेमचेंजर ! दरवर्षी मिळणार दोन लाख 46 हजार रुपयांचे व्याज
- 444 दिवसांच्या स्पेशल एफडीमधून मिळणार जबरदस्त परतावा ! एसबीआय, कॅनरा की बँक ऑफ बडोदा कोणती बँक देणार सर्वाधिक व्याज?