पुणे :- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गोहत्यांबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारत कृषी गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.
या वेळी राजे शिवराय प्रतिष्ठानचे शिवाजी खरात, विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्ष विभागाचे शिवांकुर खेर, योगेश शेटे, मानद पशु कल्याण अधिकारी गोरक्षण विभागाचे शिवशंकर स्वामी आदी उपस्थित होते. एकबोटे म्हणाले,’ गोहत्येला प्रोत्साहन देणारे वक्तव्य दानवेंसारख्या जबाबदार व्यक्तीने करणे योग्य नाही.

त्यांच्या या वक्तव्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची भावना आहे. याबाबत दानवेंचा निषेध करण्यासाठी गुरुवारी दुपारी ४ वाजता जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.
- घरातील उंदीरांचा त्रास संपवा, योगगुरू कैलाश यांच्या भन्नाट देशी ट्रिकने उंदरं घर सोडून पळतील!
- न धर्म पाहिला, न समाज..पहिल्याच नजरेत प्रेम आणि थेट केलं लग्न! ‘या’ क्रिकेटपटूंच्या लव्ह स्टोरी तुमचंही मन जिंकतील!
- अहिल्यानगरमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आढळले खराब मसाले, जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराची तपासणी करण्याचे आदेश
- आमदार रोहित पवारांच्या PA ला मारहाण झालीच नाही, सत्ता गेल्याच्या रागातून खोटे आरोप करत असल्याचा राम शिंदे समर्थकांचा दावा
- केस गळतात? पातळ वाटतात?, मग ‘हे’ देशी उपाय करा आणि 10 दिवसांतच पहा कमाल फरक!