कोल्हापूरहून थेट बिहारला विशेष रेल्वे! महाराष्ट्रामधील या ठिकाणी थांबणार, असं असेल संपूर्ण वेळापत्रक

Published on -

कोल्हापूर- उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत मध्य रेल्वेने कोल्हापूरहून कटिहारकडे जाणारी विशेष साप्ताहिक एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही रेल्वे 6 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान प्रत्येक रविवारी धावेल. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याचा विचार केला जाणार आहे.

कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून गाडी क्रमांक 01405 सकाळी 9:35 वाजता सुटेल आणि प्रवास करत तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी 6:10 वाजता कटिहार येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01406 कटिहारहून मंगळवारी संध्याकाळी 6:10 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी 3:35 वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल.

या विशेष एक्सप्रेसला महाराष्ट्रातील मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड केबिन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव आणि मनमाड या स्थानकांवर थांबे असतील. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रवाशांना थेट बिहारला जाण्याची सोय होणार आहे.

या रेल्वेचा मार्ग भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र (पटना), हाजीपूर, बरौनी, बेगुसराय, खगडिया आणि नौगचिया या स्थानकांवरून जातो.

त्यामुळे मध्य भारत आणि उत्तर भारतातील मोठ्या शहरांमध्ये प्रवाशांना थेट रेल्वे सेवा मिळणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात नोकरी आणि व्यवसायानिमित्त राहणाऱ्या बिहारी प्रवाशांची मोठ्या संख्येने वर्दळ असते. त्यांना सुटीच्या काळात गावी जाण्यासाठी ही विशेष रेल्वे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या मार्गावर प्रवाशांची मोठी मागणी असल्याने रेल्वे प्रशासनाने हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी आगाऊ तिकीट बुक करावे, अशी विनंती मध्य रेल्वेने केली आहे. उन्हाळी सुटीत प्रवासाची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे लवकर आरक्षण करणे गरजेचे आहे. जर या गाडीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला, तर ती नियमित करण्याचा विचार केला जाईल.

मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना बिहारपर्यंत थेट रेल्वे प्रवासाची सुविधा मिळणार असून उन्हाळी प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!