अहमदनगरजवळ छत्रपती संभाजीनगरात टोयोटा किर्लोस्कर करणार २० हजार कोटींची गुंतवणूक, ‘असे’ असेल प्लॅनिंग

छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सच्या प्रकल्पासाठी उद्योग विभागाने बुधवारी टोयोटा किर्लोस्कर यांच्या समवेत सामंजस्य करार केला.

Published on -

छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सच्या प्रकल्पासाठी उद्योग विभागाने बुधवारी टोयोटा किर्लोस्कर यांच्या समवेत सामंजस्य करार केला.

या प्रकल्पामुळे मराठवाड्यात सुमारे २० हजार कोटींची गुंतवणूक आणि १६ हजार रोजगार निर्मिती होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात यातून एक मोठी क्रांती येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

छत्रपती संभाजीनगरातील ऑरिक सिटीतील इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्स निर्मितीच्या ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यातील सामंजस्य करारावर सह्याद्री अतिथीगृहात सही करण्यात आली.

या प्रकल्पातून वर्षाला ४ लाख कार्सची निर्मिती होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी ८५० एकर जागा देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा,

गीतांजली किर्लोस्कर, टाटा किर्लोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझू योशी मुरा, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी सीईओ विपिन शर्मा आदी उपस्थित होते. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतूक यंत्रणेतदेखील या वाहनांचा वापर वाढवण्यात आला आहे.

गृहनिर्माण संस्थांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग केंद्र उभारण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल केले आहेत. सर्वोत्तम दळणवळण, कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि जागा राज्यात उपलब्ध आहेत. टोयोटाचे आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आणि राज्यातील कुशल मनुष्यबळामुळे चांगलीच सांगड होईल.

तसेच शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, गृहनिर्माण अशा सुविधा मुबलक उपलब्ध असल्याने कोणत्याही उद्योगाच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना येथे आनंदाने राहता येईल, असे वातावरण तयार करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य विदेशी गुंतवणुकीत अग्रेसर असून,

गेल्या दोन वर्षात दावोस येथे झालेल्या ६० दशलक्ष डॉलर्सच्या करारांची ८० टक्के अंमलबजावणी झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, जपानी भाषेत नमस्कार म्हणजे ‘कोनीचिवा’ असे संबोधून मुख्यमंत्र्यांनी भाषणाच सुरुवात केली तर ‘एरीगेटो गोझामास अशा शब्दात आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News