UPSC Interview Questions : मानवाच्या मेंदूमधून दरमिनिटाला किती रक्त वाहत असते?

Published on -

UPSC Interview Questions : यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे ही देशातील लाखो तरुणांची इच्छा असते. पण तीन टप्पे पूर्ण न करता आल्याने अनेकांची ही इच्छाच बनून राहते. नागरी सेवा परीक्षेतील मुलाखत फेरीला अनेक किचकट प्रश्न विचारले जातात.

नागरी सेवा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची क्वचितच कोणाला कल्पना असेल. यूपीएससी म्हणजेच नागरी सेवा परीक्षा ही प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

जिथे प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह, मुख्य परीक्षा सब्जेक्टिव्ह आणि मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता वाढते. आम्ही तुम्हाला IAS मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते.

या परीक्षेत किंवा मुलाखतीत असे अनेक विचारले जातात ज्यामुळे उमेदवार बुचकळ्यात पडतात. अशा वेळी आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न सांगणार आहोत, ज्याची उत्तरे तुम्हाला येतात का हे नक्की तपासून पाहा.

प्रश्न : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर : राष्ट्रपती

प्रश्न : शरीराने वापरलेल्या एकूण ऊर्जांपैकी किती टक्के ऊर्जा मेंदू वापरतो?
उत्तर : २०%

प्रश्न : जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने संबोधले जात असते?
उत्तर : नाथ सागर

प्रश्न : गीतांजली, चंद्रमुखी, चांदणी हे सर्व ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे आहेत?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर

प्रश्न : गाईच्या दुधाचा पिवळा रंग कशामुळे होत असतो?
उत्तर : केरोटीनमुळे गाईच्या दुधाचा पिवळा होतो.

प्रश्न : मानवाच्या मेंदूमधून दरमिनिटाला किती रक्त वाहत असते?
उत्तर : ७५० मिली ते १००० पर्यंत मानवाच्या मेंदूमधून दरमिनिटाला रक्त वाहत असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe