UPSC Interview Questions : गाढवांची जत्रा कुठे भरते?

UPSC Interview Questions : जेव्हा जगातील सर्वात कठीण परीक्षांचा विचार केला जातो, तेव्हा IAS परीक्षेची त्या यादीतील टॉप 10 मध्ये गणना केली जाते. लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा त्याची मुलाखत क्लिअर करणे अधिक कठीण मानले जाते.

या परीक्षेच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्याचा कोणताही विशिष्ट पॅटर्न नसल्याने उमेदवारांची क्षमता तपासण्यासाठी कुठूनही प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये असे अनेक अवघड प्रश्न आहेत, जे तुमच्या मनाला चक्रावून टाकतील.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. म्हणूनच UPSC मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांविषयी तुम्हाला ज्ञान असणे तुम्हाला आवश्यक आहे.

म्हणूनच येथे आम्ही तुम्हाला UPSC (IAS) मुलाखतीत विचारलेल्या अशाच काही अवघड प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांची माहिती देत आहोत. हे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुम्हाला या अवघड प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची याची थोडीशी कल्पना येईल.

प्रश्न : एक नागरिकत्व हा भाग भारतीय संसदेत कोणत्या देशाकडून घेतला आहे?
उत्तर : ब्रिटन

प्रश्न : कोणती व्यक्ती संसदेची सदस्य होण्यास अपात्र मानली जात असते?
उत्तर : मनोरुग्ण, सरकारी पदावरील व्यक्ती, दिवाळखोर व्यक्ती

प्रश्न : वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे?
उत्तर : वीरबाजी

प्रश्न : महाराष्ट्रामध्ये कायनाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर : गोंदिया, भंडारा

प्रश्न : ‘विदर्भ पंढरी’ म्हणून कोणते ठिकाण स्थित आहे?
उत्तर : कौडिन्यपूर ठिकाण

प्रश्न : गाढवांची जत्रा कुठे भरते?
उत्तर : राजस्थान