UPSC Interview Questions : जेव्हा जगातील सर्वात कठीण परीक्षांचा विचार केला जातो, तेव्हा IAS परीक्षेची त्या यादीतील टॉप 10 मध्ये गणना केली जाते. लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा त्याची मुलाखत क्लिअर करणे अधिक कठीण मानले जाते.
या परीक्षेच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्याचा कोणताही विशिष्ट पॅटर्न नसल्याने उमेदवारांची क्षमता तपासण्यासाठी कुठूनही प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये असे अनेक अवघड प्रश्न आहेत, जे तुमच्या मनाला चक्रावून टाकतील.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. म्हणूनच UPSC मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांविषयी तुम्हाला ज्ञान असणे तुम्हाला आवश्यक आहे.
म्हणूनच येथे आम्ही तुम्हाला UPSC (IAS) मुलाखतीत विचारलेल्या अशाच काही अवघड प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांची माहिती देत आहोत. हे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुम्हाला या अवघड प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची याची थोडीशी कल्पना येईल.
प्रश्न : महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर : रायगड जिल्हा
प्रश्न : गोदावरी व भीमा नदीचे खोरे कोणत्या पर्वत रांगेत वेगळी होतात?
उत्तर : बालाघाट
प्रश्न : कोणत्या राज्यात ‘राणी पद्मावती स्मारक’ बनवले जाणार आहे?
उत्तर : मध्य प्रदेश राज्य
प्रश्न : ‘विधेयक मांडणे’ हा कोणत्या सभागृहाचा अधिकार आहे?
उत्तर : लोकसभा
प्रश्न : देशामध्ये सर्वात जास्त आयुष्यमान भारत केंद्र कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : महाराष्ट्र राज्य
प्रश्न : ‘संविधानाचा आत्मा’ असे संविधानाच्या कोणत्या कलमाला म्हणतात?
उत्तर : कलम ३२