UPSC Interview Questions : महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत?

Published on -

UPSC Interview Questions : यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे ही देशातील लाखो तरुणांची इच्छा असते. पण तीन टप्पे पूर्ण न करता आल्याने अनेकांची ही इच्छाच बनून राहते. नागरी सेवा परीक्षेतील मुलाखत फेरीला अनेक किचकट प्रश्न विचारले जातात.

नागरी सेवा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची क्वचितच कोणाला कल्पना असेल. यूपीएससी म्हणजेच नागरी सेवा परीक्षा ही प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

जिथे प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह, मुख्य परीक्षा सब्जेक्टिव्ह आणि मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता वाढते. आम्ही तुम्हाला IAS मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते.

या परीक्षेत किंवा मुलाखतीत असे अनेक विचारले जातात ज्यामुळे उमेदवार बुचकळ्यात पडतात. अशा वेळी आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न सांगणार आहोत, ज्याची उत्तरे तुम्हाला येतात का हे नक्की तपासून पाहा.

प्रश्न : ‘नायडू’ ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : बुद्धिबळ खेळ

प्रश्न : ‘खेतान’ ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : बुद्धिबळ खेळ

प्रश्न : प्लासीची लढाई कोणा- कोणामध्ये झाली होती?
उत्तर : सिराज उदौला आणि इंग्रज

प्रश्न : पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?
उत्तर : ऊस

प्रश्न : भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती कोण होते?
उत्तर : सर्वपल्ली राधाकृष्ण

प्रश्न : महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर : ठाणे जिल्हा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!