UPSC Interview Questions : मराठीतील सर्वात पहिली कादंबरी कोणती आहे?

Published on -

UPSC Interview Questions : UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते आहे?
उत्तर : महाराष्ट्र

प्रश्न : महाराष्ट्रातून लोकसभेसाठी अनुसूचित जमातीतुन किती जागा राखीव आहेत?
उत्तर : चार जागा

प्रश्न : महाराष्ट्रामध्ये फुलांचा सर्वात मोठा बाजार कोणत्या जिल्ह्यात भरतो?
उत्तर : पुणे जिल्हा

प्रश्न : जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?
उत्तर : सुपिरियर सरोवर

प्रश्न : तहसीलदाराला पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर : राज्यपाल

प्रश्न : मराठीतील सर्वात पहिली कादंबरी कोणती आहे?
उत्तर : यमुनापर्यटन कादंबरी

प्रश्न : शरीराला सर्वात जास्त ऊर्जा पुरवण्याचे कार्ये कोणता घटक करतो?
उत्तर : साखर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe