UPSC Interview Questions : भारताला कोणत्या रुग्णांची राजधानी म्हणून ओळखले जाते?

Published on -

UPSC Interview Questions : जेव्हा जगातील सर्वात कठीण परीक्षांचा विचार केला जातो, तेव्हा IAS परीक्षेची त्या यादीतील टॉप 10 मध्ये गणना केली जाते. लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा त्याची मुलाखत क्लिअर करणे अधिक कठीण मानले जाते.

या परीक्षेच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्याचा कोणताही विशिष्ट पॅटर्न नसल्याने उमेदवारांची क्षमता तपासण्यासाठी कुठूनही प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये असे अनेक अवघड प्रश्न आहेत, जे तुमच्या मनाला चक्रावून टाकतील.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. म्हणूनच UPSC मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांविषयी तुम्हाला ज्ञान असणे तुम्हाला आवश्यक आहे.

म्हणूनच येथे आम्ही तुम्हाला UPSC (IAS) मुलाखतीत विचारलेल्या अशाच काही अवघड प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांची माहिती देत आहोत. हे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुम्हाला या अवघड प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची याची थोडीशी कल्पना येईल.

प्रश्न : पाच वर्षाखालील मुलांना कोणत्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते?
उत्तर : निळ्या रंगाचे आधारकार्ड

प्रश्न : रक्तदान केल्याने व्यक्तीला कोणता त्रास होऊ शकतो?
उत्तर : चक्कर येणे

प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या दिवशी पंतप्रधान पदाची शपत घेतली होती?
उत्तर : २६ मे २०१४

प्रश्न : भारतामध्ये केंद्रीय सरकारचा प्रमुख व्यक्ती कोणता असतो?
उत्तर : पंतप्रधान

प्रश्न : देशाच्या राष्ट्रपतींचा प्रमुख सल्लागार कोणता व्यक्ती असतो?
उत्तर : पंतप्रधान हे देशाच्या राष्ट्रपतींचा प्रमुख सल्लागार व्यक्ती असतात.

प्रश्न : भारताला कोणत्या रुग्णांची राजधानी म्हणून ओळखले जाते?
उत्तर : मधुमेह रुग्णांची राजधानी म्ह्णून भारताला ओळखले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News