UPSC Interview Questions : यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे ही देशातील लाखो तरुणांची इच्छा असते. पण तीन टप्पे पूर्ण न करता आल्याने अनेकांची ही इच्छाच बनून राहते. नागरी सेवा परीक्षेतील मुलाखत फेरीला अनेक किचकट प्रश्न विचारले जातात.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

जिथे प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह, मुख्य परीक्षा सब्जेक्टिव्ह आणि मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता वाढते. आम्ही तुम्हाला IAS मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते.
या परीक्षेत किंवा मुलाखतीत असे अनेक विचारले जातात ज्यामुळे उमेदवार बुचकळ्यात पडतात. अशा वेळी आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न सांगणार आहोत, ज्याची उत्तरे तुम्हाला येतात का हे नक्की तपासून पाहा.
प्रश्न : महाराष्ट्राचा प्रशासकीय विभाग नसलेला जिल्हा कोणता आहे?
उत्तर : सिंधुदुर्ग
प्रश्न : ज्योतिबा हे स्थानिक डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : कोल्हापूर जिल्हा
प्रश्न : आगाखान पॅलेस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : पुणे जिल्हा
प्रश्न : भारताचे अध्यात्मिक राष्ट्रपिता असे कोणाला म्हटले जाते?
उत्तर : स्वामी विवेकानंद
प्रश्न : जुन्या कवींचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
उत्तर : बीड जिल्हा
प्रश्न : पहिले पंतप्रधान होण्याचा हट्ट कोणी धरला होता ज्यामुळे भारत- पाकिस्तान विभागणी झाली?
उत्तर : बॅरिस्टर जिना