पुढची सुट्टी इथेच! भारतातील ‘या’ नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांसमोर गोवा-मालदीव फिके, पाहा तिथे कसं पोहोचाल?

Updated on -

जर तुम्हाला नयनरम्य समुद्रकिनारे पाहायचे असतील, तर गोवा आणि मालदीवपेक्षा वेगळं काहीतरी अनुभवायला हवं. सर्वांनाच समुद्रकिनारे म्हटले की गोवा अगोदर आठवते. मात्र, गोव्यापेक्षाही काही ठिकाणे अशी आहेत, जेथील सौंदर्य बघून तुम्ही थक्क व्हाल. हे किनारे इतके सुंदर आहेत की गोवा आणि मालदीवचे किनारे तुम्ही विसरून जाल.

राधानगर बीच

या दोन किनाऱ्याचे ठिकाण अंदमान आणि निकोबार बेटांवर आहे. विशेषत: हॅवलॉक बेटावर असलेला राधानगर बीच याचा अनुभव अविस्मरणीय असतो. या समुद्रकिनाऱ्यावरची चमकदार पांढरी वाळू आणि निळसर समुद्र यांचा नजारा इतका मनमोहक असतो की तुम्हाला तिथे नेहमीच परत येण्याची इच्छा होईल. या किनाऱ्याला वेगळेपणा देणारी गोष्ट म्हणजे तेथील हिरवेगार जंगल आणि गर्दीपासून दूरची शांतता, जी शहराच्या धकाधकीपासून पूर्णपणे वेगळी आहे.

राधानगर बीचवर तुम्ही फक्त निसर्गाचा आनंदच नाही तर स्पोर्ट्स अॅक्टिविटी देखील अनुभवू शकता. समुद्रातील थंडगार पाण्यात पोहताना किंवा फक्त किनाऱ्यावर वेळ घालवताना मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. तिथल्या सुर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे दृश्यही इतके सुंदर असते की ते कधीच विसरता येत नाहीत.

कोवलम बीच

दुसरा सुंदर समुद्रकिनारा केरळमधील कोवलम बीच आहे. या किनाऱ्याची खासियत म्हणजे तो नेहमीच पर्यटकांनी भरलेला असतो, पण तरीही त्याची निसर्गरम्यता आणि शांतता कायम टिकलेली असते. येथील वातावरण आणि समुद्रकिनाऱ्याचा नजारा तुम्हाला नक्कीच भारावून टाकेल.

जर तुम्हाला गोवा किंवा मालदीवच्या गर्दीच्या किनाऱ्यांपेक्षा अधिक शांत, निसर्गरम्य आणि मनाला स्पर्श करणारे समुद्रकिनारे अनुभवायचे असतील, तर हे दोन ठिकाणे तुमच्या प्रवास यादीत अगदी वरच्या स्थानी असायला हवेत. तुम्ही एकदा तरी या ठिकाणी भेट देऊन या सौंदर्याचा अनुभव घ्यायलाच हवा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News